शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांना मनस्ताप देणाऱ्यांना अटक करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 14:25 IST

कुरघोड्यांना कंटाळून महाराजांनी तपोवन आश्रम सोडला

खामगाव :  येथून जवळच असलेल्या  ‘तपोवन’ आश्रमातून अचानक निघून गेलेल्या शंकर महाराजांचा शोध घ्यावा. तसेच शंकर महाराजांना मनस्ताप देणाऱ्या दुष्टप्रवृत्तींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी महाराजांच्या अनुयायांनी सोमवारी सकाळी ग्रामीण पोलिस स्टेशनसह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर धडक दिली. 

खामगाव येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराजांना आश्रमातील काहींजणांसोबतच शाळेतील शिक्षकांकडून मनस्ताप दिला जात आहे. या प्रवृत्तीमुळे संस्थेत गल्लीच्छ राजकारणाचा शिरकाव झाला. दबावतंत्र असह्य झाल्याने महाराजांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याजवळ चिठ्ठी सोपवून रविवारी सकाळी तपोवन सोडले. ही बाब वाऱ्यासारखी पसरताच, महाराजांचे मूळ गाव असलेल्या प्रिंपाळा येथील अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. प्रिंपाळा, शेलोडी, टेंभूर्णा, लाखनवाडा, बोरी अडगाव, आंबेटाकळी, खामगाव येथील शेकडो भाविकांनी सकाळीच शेलोडी येथील जागृती आश्रमात धडक दिली. त्यानंतर भाविकांचा हा जत्था ग्रामीण पोलिस स्टेशनवर गेला. येथे पोलिस निरीक्षक रफिक शेख यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाविकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. 

शंकर महाराजांना मनस्ताप  देणाऱ्यांमध्ये गोपाळ टिकार, प्रभुदास टिकार, रमेश टिकार, प्रदीप गावंडे, महादेव धांडे यांची नावे समाविष्ट आहेत. उपरोक्त पाच जणांचा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असला तरी, बोरी अडगाव आणि टेंभूर्णा येथील काही पालकांचाही यामध्ये अप्रत्यक्ष सहभाग आहे. काही पालकांनी मुख्य कार्यकारी निवेदन देत, प्रदीप गावंडे यांच्या अनुपस्थितीबाबत तसेच शाळेच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपोषणाची धमकीही दिली होती. यामध्ये सुधीर टिकार, अच्युत टिकार, अनिल टिकार, सुधाकर टिकार, उत्तम टिकार, नारायण टिकार यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही पोलिसांना भाविकांनी यावेळी दिली. या गलीच्छ राजकारणामुळेच महाराजांची मनस्थिती विचलित झाली. पालकांना आंदोलनासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोपही यावेळी भाविकांनी केला. त्यामुळे महाराजांना मनस्ताप देणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाईची मागणीही यावेळी भाविकांनी लावून धरली. यावेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले. 

आमदारांचे प्रयत्न निष्फळ!जागृती आश्रमातील वाद मिटविण्यासाठी खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. फुंडकर यांनी प्रयत्न केले. संस्थेच्या प्रत्येक सदस्यांना त्यांनी महाराजांची भूमी आणि संस्था महाराजांच्या ताब्यात देण्याचाही तोडगा आमदारांनी काढला होता. महाराजांच्या समर्थनार्थ काही जणांनी राजीनामा दिला. तर इतरांनी राजीनामा न देता, दबावतंत्राचा अवलंब केला. त्यामुळे याप्रकरणी आमदारांचेही प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा आहे.

आश्रमाची जमीन बळकावण्यासाठी तसेच संस्था काबीज करण्यासाठी महाराजांना मनस्ताप दिल्या जात होता. त्रास असह्य झाल्यामुळेच महाराज निघून गेले. जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जावी.-विठ्ठल पेसोडे, सरपंच प्रिंपाळा, ता. खामगाव.

भाविकांकडून तीव्र भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. पोलिस प्रशासनाकडून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. महाराजांनी लिहीलेल्या चिठ्ठीत नमूद असलेल्यांचा पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.- रफीक शेख, निरिक्षक, ग्रामीण पोलिस स्टेशन, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे