शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

जिल्ह्यातील १९५ गावे होणार जलसंपन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:31 IST

राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे.

ठळक मुद्देशिवार झाले पाणीदारसिंचन होईल जोमदार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे. आता  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  बुलडाणा जिल्ह्यातही या अभियानाने चांगलेच बाळसे धरले  आहे. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३0 गावे पहिल्या ट प्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये  जलसंधारणाची विविध प्रकारची ९ हजार १३२ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमा तून जिल्ह्यात ४५ हजार २७0 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला  आहे, तसेच ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षम ता निर्माण झाली आहे, तर २0 हजार ६ हेक्टर क्षेत्रावर दोन  वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली. त्याचप्रमाणे सन  २0१६-१७ मध्ये  दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी  काढण्यात येऊन गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची  कामे होऊ शकतात, याबाबत निश्‍चितता करण्यात आली आहे.  दुसर्‍या टप्प्यातील २४५ गावांमध्ये ३ हजार २९६ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत, तर ८८ कामे प्रगतीपथावर आहे. या ट प्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून १७ हजार  १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे, तसेच ७ हजार  २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर  क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे.  त्याचप्रमाणे  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  या  गावांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. पहिल्या  टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी ८0 गावे यामध्ये  प्राधान्याने निवडण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे  भूजलच्या कमतरतेमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला  आहे. भूजल स्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या ८0 गावांमध्ये  पाणी टंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे.  सतत बाहेरून  पाणी आणून या गावकर्‍यांची तहान भागविल्या जात आहे.  या  गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात  भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार  अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी  निश्‍चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे  जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला  खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा  आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे  पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या  विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे.  या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत  महत्त्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालु क्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गावशिवारात पाणीसाठा  जलसंधारणच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शे तकरी सिंचन करून पिके घेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस