शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यातील १९५ गावे होणार जलसंपन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:31 IST

राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे.

ठळक मुद्देशिवार झाले पाणीदारसिंचन होईल जोमदार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे. आता  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  बुलडाणा जिल्ह्यातही या अभियानाने चांगलेच बाळसे धरले  आहे. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३0 गावे पहिल्या ट प्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये  जलसंधारणाची विविध प्रकारची ९ हजार १३२ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमा तून जिल्ह्यात ४५ हजार २७0 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला  आहे, तसेच ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षम ता निर्माण झाली आहे, तर २0 हजार ६ हेक्टर क्षेत्रावर दोन  वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली. त्याचप्रमाणे सन  २0१६-१७ मध्ये  दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी  काढण्यात येऊन गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची  कामे होऊ शकतात, याबाबत निश्‍चितता करण्यात आली आहे.  दुसर्‍या टप्प्यातील २४५ गावांमध्ये ३ हजार २९६ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत, तर ८८ कामे प्रगतीपथावर आहे. या ट प्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून १७ हजार  १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे, तसेच ७ हजार  २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर  क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे.  त्याचप्रमाणे  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  या  गावांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. पहिल्या  टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी ८0 गावे यामध्ये  प्राधान्याने निवडण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे  भूजलच्या कमतरतेमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला  आहे. भूजल स्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या ८0 गावांमध्ये  पाणी टंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे.  सतत बाहेरून  पाणी आणून या गावकर्‍यांची तहान भागविल्या जात आहे.  या  गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात  भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार  अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी  निश्‍चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे  जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला  खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा  आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे  पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या  विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे.  या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत  महत्त्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालु क्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गावशिवारात पाणीसाठा  जलसंधारणच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शे तकरी सिंचन करून पिके घेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस