शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्यायला पाणी नाही, महामार्गाच्या बांधकामासाठी पाण्याचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 15:47 IST

शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलढाणा जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे, असे असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकमतने या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की खामगाव चिखली -जालना मार्गावर सध्या बांधकाम सुरू आहे. याशिवाय शेगाव पंढरपूर या महामार्गाचे सुद्धा काम सुरू आहे. सोबतच खामगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. एकीकडे नागरिकांना वापरायला तर सोडा प्यायलाही पाणी नाही अशा परिस्थितीत बांधकामासाठी होत असलेला हा पाण्याचा वापर निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे दिसून येते. नागरिकांनी या संदर्भात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात यावे अशी मागणी केली आहे. आधी प्यायला पाणी द्या नंतर विकास करा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. कालच काँग्रेस समितीने दुष्काळी दौरा केला. खामगाव ते शेगाव या रस्त्यावर असलेल्या चिंचोली या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि विशेष म्हणजे याच गावाच्या समोर शेगाव पंढरपूर महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात असल्याचे वास्तव आहे. अशाच प्रकारची परिस्थिती खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे आहे  या या समोर खामगाव-जालना महामार्गाचे काम सुरू आहे  आणि गावात पाणी टंचाई असतानाही गावात पुरेसा पाणी पुरवठा न करता रस्त्याच्या कामासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सर्व प्रकारची बांधकामे थांबवण्यात यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत मात्र या प्रकाराकडे कंत्राटदारांनी केले आहे. शेगाव व खामगाव तहसीलदारांच्या नाकावर टिचुन बेकायदेशीर कामे सुरू आहेत.  दोन्ही तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई असल्यानंतरही एकाही तहसीलदाराने अद्याप एकाही गावामध्ये भेट दिली नाही. एकीकडे नागरिकांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती असताना पाण्याचा होत असलेला हा निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाईhighwayमहामार्ग