शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

प्यायला पाणी नाही, महामार्गाच्या बांधकामासाठी पाण्याचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 15:47 IST

शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलढाणा जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे, असे असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकमतने या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की खामगाव चिखली -जालना मार्गावर सध्या बांधकाम सुरू आहे. याशिवाय शेगाव पंढरपूर या महामार्गाचे सुद्धा काम सुरू आहे. सोबतच खामगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. एकीकडे नागरिकांना वापरायला तर सोडा प्यायलाही पाणी नाही अशा परिस्थितीत बांधकामासाठी होत असलेला हा पाण्याचा वापर निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे दिसून येते. नागरिकांनी या संदर्भात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात यावे अशी मागणी केली आहे. आधी प्यायला पाणी द्या नंतर विकास करा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. कालच काँग्रेस समितीने दुष्काळी दौरा केला. खामगाव ते शेगाव या रस्त्यावर असलेल्या चिंचोली या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि विशेष म्हणजे याच गावाच्या समोर शेगाव पंढरपूर महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात असल्याचे वास्तव आहे. अशाच प्रकारची परिस्थिती खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे आहे  या या समोर खामगाव-जालना महामार्गाचे काम सुरू आहे  आणि गावात पाणी टंचाई असतानाही गावात पुरेसा पाणी पुरवठा न करता रस्त्याच्या कामासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सर्व प्रकारची बांधकामे थांबवण्यात यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत मात्र या प्रकाराकडे कंत्राटदारांनी केले आहे. शेगाव व खामगाव तहसीलदारांच्या नाकावर टिचुन बेकायदेशीर कामे सुरू आहेत.  दोन्ही तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई असल्यानंतरही एकाही तहसीलदाराने अद्याप एकाही गावामध्ये भेट दिली नाही. एकीकडे नागरिकांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती असताना पाण्याचा होत असलेला हा निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाईhighwayमहामार्ग