शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन योग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:57 IST

बुलडाणा:  शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे शिक्षकांच्या  ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक अ ितरिक्त शिक्षकांना काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या  शाळेचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे  शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे, असा सूर   ‘शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे की  अयोग्य?’ या विषयावर  बुधवारी आयोजित परिचर्चेत उमटला.  

ठळक मुद्देलोकमत परिचर्चेतील सूर नियमावलीत बदल करणे आवश्यक

बुलडाणा:  शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे शिक्षकांच्या  ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक अ ितरिक्त शिक्षकांना काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या  शाळेचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे  शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे, असा सूर   ‘शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे की  अयोग्य?’ या विषयावर  बुधवारी आयोजित परिचर्चेत उमटला.  देशाची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असून, सर्वच कामे  ऑनलाइन होत आहेत. त्यात शिक्षक विभाग मागे नाही. सध्या  शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत  अतिरिक्त शिक्षकाची माहिती टाकण्यात येत असून, रिक्त  असलेल्या शाळेतील पदे समायोजनाद्वारे भरण्यात येत आहे. या  प्रक्रियेत अतिरिक्त शिक्षकाला तालुक्यातील २0 गावांपैकी एक  गावातील रिक्त असलेल्या शाळेवर नियुक्ती मिळणार आहे. या  प्रक्रियेमुळे अतिरिक्त शिक्षकाला काम मिळणार असून, रिक्त  जागा असलेल्या शाळेचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे; मात्र  या प्रक्रियेत खासगी संस्थेचे काही प्रमाणात नुकसान होणार   आहे. त्यामुळे   ऑनलाइन प्रक्रिया चांगली असली त्याच्या  नियमात बदल करणे आवश्यक असल्याचे सहभागी मान्यवरांनी  सांगितले. 

शिक्षक समायोजनची ऑनलाइन प्रक्रिया अयोग्य असून, त्यामुळे  अनेक चांगल्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. यापूर्वी समु पदेशन करून शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत होत्या. त्यात  बदलीपात्र शिक्षकाला तालुक्यातील ५0 गावांपैकी एका गावाची  निवड करण्याची संधी मिळत होती; मात्र ऑनलाइन प्रक्रियेत  तालुक्यातील फक्त २0 गावांपैकी एक गाव निवड करण्याची  संधी मिळणार आहे.  त्यामुळे संबंधित शिक्षकाला योग्य गावाची  निवड करण्याची संधी मिळेल किंवा नाही, हे सांगत येत नाही.  त्यामुळे सदर पद्धत चुकीची आहे.                                             - रवींद्र नादरकर, शिक्षक, चिखली.

शिक्षण विभागातर्फे शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ऑनलाइन  समायोजन करण्यात येत आहे. सदर पद्धत योग्य असून, त्यामुळे  भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद  शाळेत अतिरिक्त शिक्षक असताना राजकीय हस्तक्षेपामुळे  शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत नाही. त्यामुळे ऑनलाइन  समायोजन प्रक्रिया चांगली असून, भ्रष्टाचार व चिरिमिरीला  आळा बसणार आहे. ज्या संस्था ऑनलाइन प्रक्रियेतून आलेल्या  शिक्षकाला रुजू करून घेणार नाहीत, त्या संस्थेचे अनुदान  प्रक्रिया थांबणार आहे, त्यामुळे हा निर्णय चांगला आहे.- डी. डी.वायाळ, शिक्षक, बुलडाणा.

शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे; परंतु  शिक्षक समायोजनासंदर्भात खाजगी संस्थेचे अधिकार काढण्यात  आल्यामुळे शाळेचे व संस्थेचे काही  नुकसान होण्याची शक्यता  आहे. खासगी संस्थेतील अतिरिक्त ठरलेला शिक्षक कनिष्ठ  शिक्षक असतो. त्याचे समायोजन केल्यानंतर रिक्त जागा  असलेल्या संस्थेला चांगला शिक्षक हवा असल्यास तसेच  समायोजनानुसार येणारा शिक्षक अनुभवाने कमी असल्यास त्या  संस्थेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्त जागा  असलेल्या संस्थेत समायोजनेनुसार शिक्षक द्यावा; मात्र त्याची  मुलाखत घेण्याचे अधिकार संस्थेला देणे आवश्यक आहे.      -सुनील जवंजाळ, प्राचार्य तथा अभ्यास मंडळ सदस्य,  कोलवड, बुलडाणा.

शिक्षण विभागातर्फे सुरू असलेली शिक्षक समायोजन प्रक्रिया  योग्यच आहे. अनेक शाळेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना विना  कामाचे वेतन देण्यात येत होते. तर अनेक शाळेत रिक्त  असलेल्या जागेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते;  मात्र ऑनलाइन समायोजन योजनेमुळे बिंदू नामावलीनुसार रिक्त  पदावर विषयनिहाय नियुक्ती मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना  काम मिळून शासनाचे होणारे नुकसान टळणार असून, रिक्त  जागा भरल्या जाणार आहेत.   - रामेश्‍वर तायडे, मुख्याध्यापक, शरद पवार हायस्कूल,  भडगाव ता. बुलडाणा

जिल्ह्यातील अनेक खासगी संस्थेत शिक्षकांच्या अनेक जागा  रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान  होते; मात्र शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन योजनेमुळे खासगी  संस्थेत जागा भरल्या जाणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान टळणार आहे; मात्र या प्रक्रियेमुळे खासगी संस्थेचे काही  प्रमाणात नुकसान होणार आहे. संस्थेला आवश्यक असलेला  उमेदवार ऑनलाइन प्रक्रियेनुसार येणार असल्यामुळे संस्थेला  कशा प्रकारचा उमेदवार हवा, याबाबत निवड करण्याचे  अधिकार नसल्यामुळे संस्थेचे नुकसान होणार आहे. - बाळ अयाचित, शिक्षक, बुलडाणा.