शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

अंढेरा परिसरात पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा

By ram.deshpande | Published: July 26, 2017 1:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार ...

ठळक मुद्देधरणे कोरडीच : गावक-यांवर पाणीटंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अंढेरा, शिवणी आरमाळ, मेंडगाव येथील धरणात आतापर्यंत जलसाठ्यात वाढ झाली नसून, सदर धरणात आतापर्यंत शून्य मृतसाठा आहे, तसेच परिसरातील पाझर तलावसुद्धा कोरडेच आहे.शिवणी आरमाळ येथून परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो; परंतु धरणात पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या अनेक योजना ठप्प पडल्या आहेत. अंढेरासह परिसरात पाटाचे पाणी येत असल्याने यावर्षी रब्बी पिकांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. रब्बी पिकांना नगदी पिके म्हणून पाहिली जातात; परंतु पाणीच नसेल तर शेतकºयांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, पाडळी शिंदे, पिंप्री आंधळे, धोत्रा नंदई, सावखेड नागरे या गावांमध्ये आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस झाल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग ही खरिपाची पिके चांगली आहेत. आतापर्यंत परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.या गावांना होतो टँंकरने पाणी पुरवठाअंढेरा गावासह परिसरातील पाडळी शिंदे, धोत्रा नंदई, नागणगाव या गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असून, परिसरात आतापर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील विहिरी, धरण, पाझर तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने शिवणी आरमाळ, अंढेरा, मेंडगाव येथील धरणात पाणी नसल्याने हे प्रकल्प कोरडेच आहेत. येथून गावांना पाणीपुरवठा करण्यात योजना पाण्याअभावी बंद आहेत. जनावरांनासुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागते.