शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत खड्ड्यात गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 11:45 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले. 

- नारायण सावतकरबुलढाणा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले. या वर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला असला तरी दुष्काळाच्या उपाययोजना अजून जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता स्वतःला जमिनीत गाडून घेतले. आंदोलनावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतक-यांची  उपस्थिती होती. शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल चोपडे, सुनील अस्वार, विलास तराळे, योगेश मुरुख, शिवा पवार, गोपाल वसतकार, प्रकाश भगत, संजय बोरवार, सुखदेव अमझरे, रमेश नांदने, सागर खानझोड, सागर डोंगरे, दादाराव जाधव, सोपान कुरवाळे सह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना