शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

डॉक्टरचा असाही प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:01 IST

देऊळगाव मही : देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बुद्रूक येथील एका महिलेचे देवदर्शनासाठी मंदिरात गेले असता गळ्यातील ५० हजार रुपयांचे ...

देऊळगाव मही : देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस बुद्रूक येथील एका महिलेचे देवदर्शनासाठी मंदिरात गेले असता गळ्यातील ५० हजार रुपयांचे हरवलेले मंगळसूत्र गावातीलच डॉ. नारायण लाड यांनी परत केले आहे. त्यामुळे आजही समाजात प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत असल्याचे निदर्शनास येत आहे.

एरवी हरवलेली एखादी किमती वस्तू किंवा पैसे सहसा कोणाला परत मिळत नाही. मात्र अपवादात्मक स्थितीत अशा किमती वस्तू संबंधितांना परत मिळतात. असाच प्रकार देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बुद्रूक येथे घडला. येथील लताबाई नाराण पऱ्हाड या ९ मार्च रोजी सायंकाळी गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र या दरम्यान त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानकपणे गळून पडले. त्याचा शोध त्यांनी घेतला पण ते सापडले नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी डॉ. नारायण लाड हे मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना हे मंगळसूत्र सापडले. दरम्यान, चौकशी केली असता त्यांना हे मंगळसूत्र लता नारायण पऱ्हाड यांचे असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी खातरजमा करून ते त्यांना परत केले. आपल्या कृतीमधून डॉ. लाड यांनी आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दर्शविले आहे.