शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्यार्थ्यांना आहाराऐवजी मिळणार थेट तांदूळ व दाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:46 IST

पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपुर : कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण संचालकांनी ३० मार्च रोजी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराऐवजी थेट धान्य वाटप करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषदेने ३० मार्च रोजी या संदभार्तील आदेश पंचायत समिती व प्रत्येक शाळेत दिले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ७ ते ११ दरम्यान पोषण आहारातील तांदूळ व दाळ वाटपासाठी तालुक्यातील सर्व शाळांवर शालेय शिक्षण समितीची पुर्वनियोजित बैठक पार पडली. शिक्षण विभागाच्या या आदेशाने तालुक्यातील १२१ शाळांमधील १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. दि. १ ते ३ एप्रिल पर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांना बोलावून वाटप करण्यात येणार आहे. २५ विद्यार्थ्यांना १ मिटर अंतरावर उभे करून पोषण आहाराचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. संग्रामपूर तालुक्यात पहिली ते पाचवी पर्यंत ९ हजार ५१४ तर सहावी ते आठवी पर्यंत ५ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे तांदूळ, डाळ, कडधान्य समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणू संसर्गा पादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केली. त्यामुळे आदिवासी गोरगरीब शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. संचारबंदी दरम्यान शाळा बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शालेय पोषण आहाराचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा पालकांनी स्वागत केले आहे. शाळेमधून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे धान्य वाटपाची प्रक्रिया आज बुधवारी रोजीपासून सुरू होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरSchoolशाळाStudentविद्यार्थी