शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

अडते अडकले शेतमाल हमीभावाच्या भोवर्‍यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:38 PM

बुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्‍यांनी हमीभावाने  सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून  केवळ २  हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे.

ठळक मुद्देमिल्सकडून अडत्यांना २,८00 रुपये भाव माल पोहोचविण्यास ३00 रुपये खर्च

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्‍यांनी हमीभावाने  सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून  केवळ २  हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे. तसेच  सोयाबीन मिल्सपर्यंत माल पोहोचविण्यासाठी येणारा खर्चही  ३00 रुपयांपर्यंत जात आहे.  हमीभाव मिळत नसल्याने शे तकर्‍यांचा रोष आणि सोयाबीन मिल्सकडून मिळणारा अत्यल्प  भाव, यामुळे अडतेच हमीभावाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमाल बाजार समितीमध्ये येत  असून, त्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु  बाजार समितीमध्ये अडते व व्यापार्‍यांकडून शेतमालाला  हमीभाव मिळत नाही. मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये प्रति िक्ंवटल हमीभाव असतानाही मुगाला ४ हजार ते ४ हजार ५00  रुपयेच हमीभाव मिळत आहे. उडिदाला ५ हजार ४00 रुपये  हमीभाव असून, सध्या २ हजार ५00 ते ३ हजार रुपयेच भाव  मिळत आहे. त्यानंतर सोयाबीनला ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठेवलेला असतानाही  २ हजार ५00 रुपयांपर्यंत भाव दिला जात  आहे. शासनाकडूनसुद्धा अडत्यांना हमीभावाने शेतमाल खरेदी  करण्याचे आदेश दिले जातात; परंतु अडत्यांनी खरेदी केलेल्या  मालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडतेसुद्धा शेतमाल  हमीभावाने खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. एफए क्यू सोयाबीनचा माल हा बाजार समितीमध्ये २ हजार ५00 ते २  हजार ५५0 रुपये क्विंटलने खरेदी केला तर तोच माल सोयाबीन  मिल्स २ हजार ७00 ते २ हजार ८00 भावाने अडत्यांना द्यावा  लागतो. त्यानंतर सोयाबीन मिल्सपर्यंत माल पोहोचण्यासाठी  २५0 ते ३00 रुपये खर्च लागतो. वाहन भाडे, बटाव कमिशन, बारदाना एक किलो कट्टी, माती  डागी, आर्दता क्लेमसुद्धा करण्यात येतो. शासनाच्या हमीभावाचा  नियम मिल्सला न लावता केवळ अडते किंवा व्यापार्‍यांनाच  लावला जातो. मिल्सकडून शासनाच्या हमीभावाप्रमाणे शेतमाल  ७00 ते १२00 रुपये फरकाने खरेदी केल्या जात असल्याने  अडतेसुद्धा शासनाच्या हमीभावाप्रमाणे माल खरेदी करण्यासाठी  अडचणीत सापडत आहेत. 

धुळ्याला जातो बुलडाण्याचा माल बुलडाणा जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे. अडत व व्यापार्‍यांकडून  खरेदी केलेली सोयाबीन धुळे येथील  मिल्सला पाठविल्या जाते;  परंतु सोयाबीन मिल्सवर योग्य भाव अडत्यांना भेटत नसल्याने  अडते व व्यापारीसुद्धा शेतकर्‍यांना हमीभाव देत नाहीत.   

गरजवंतांचीच सोयाबीन बाजार समितीत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला  योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनचा  माल घरीच साठून ठेवलेला आहे; मात्र आर्थिक अडचण  असलेले शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत  आहेत. आर्थिक नड भागविण्यासाठी शेतकर्‍यांना कमी भावात  सोयाबीन विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याने बाजार समि तीमध्ये बहुतांश गरजवंत शेतकर्‍यांचेच सोयाबीन विक्रीसाठी येत  आहे.

या कारणांमुळे मिळत नाही हमीभाव- अडत्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला मिल्सवर केवळ २  हजार ८00 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे अडते कमी  दरात सोयाबीन खरेदी करतात. - हमीभावाचा नियम हा फक्त अडते किंवा व्यापार्‍यांनाच आहे,  हा नियम कुठल्याही मिल्स वाल्याला लावला जात नाही.  त्यामुळे अडत्यांच्या मालाला भाव मिळत नाही. - मिल्सवर माल पोहोचण्यासाठी २५0-३00 रुपये खर्च आहे.  त्यानंतर मोटार भाडे, बटाव कमिशन, बारदाना एक किलो कट्टी,  माती डागी, आर्द्रता, क्लेम करण्यात येतो.- मिल्सवर शेतमाल आल्यानंतर १0 ते १२ आर्द्रतेपर्यंतचा माल  असल्यास १ किलोचे पैसे कापण्यात येतात. त्यानंतर १२ पेक्षा  जास्त आर्द्रता असल्यास कपातही डबल होते. डागी माल  मिल्सवर आल्यानंतर कपात केली जाते. 

टॅग्स :agricultureशेती