शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा जिल्ह्यात कहर

By admin | Updated: June 8, 2017 02:36 IST

चार दिवसात चौघांचा मृत्यू: १५ जखमी, ३१ गावे प्रभावित

बुलडाणा: जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने १ जून रोजी हजेरी लावली. जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा आणि पावसामुळे नुकसान झाले असून, चार दिवसात चौघांचा मृत्यू झाला. तसेच १५ जण जखमी तर ३१ गावे प्रभावित झाली. जिल्ह्यात १ जूनपासून वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. १ जून ते ७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४४.२ मि.मी पावसाची नोंद घेण्यात आली. याची सरासरी ६.२० टक्के नोंदविण्यात आली. गत वर्षी ७ जूनपर्यंत केवळ ८.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे यंदा पडलेला पाऊस निश्चित जास्त तीव्रतेचा आहे. पावसादरम्यान पडलेल्या विजा आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील सरंबा, भालेगाव, मंगरुळ नवघरे, शेलगाव आटोळ, देऊळगाव धनगर, गिरोला, धोडप, पेडका, वळती, देऊळगाव वापसा, किनगावराजा, हिवरखेड, मोताळा, रोहिणखेड, धामणगाव बढे, ब्राम्हंदा, रोहिणखेड, पोफळी, सारोळा मारोतीसह, पिंप्रीगवळी, वरदडा, इसोली, देऊळघाट, हतेडी, पाडळी, धाड, अमडापूर, हिवराआश्रम ही ३१ गावे प्रभावित झाली. यामध्ये शाळा व घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू, विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. शासनाच्यावतीने जिल्ह्यात कुठेही वीज रोधक यंत्र लावण्यात आले नसून, शासनाच्या भोंगळ कारभाराची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहेत. घरावरील पत्रे उडाली वीज पडून २ जून रोजी भालेगाव येथील रूक्मिणा धोंडगेचा मृत्यू झाला, तर यात तीन जखमी झाले. ३ जून रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव वापसा येथील विजय गरकळ , संतोष गरकळ व सुरेश काळे यांचा मृत्यू झाला. शेलगाव आटोळ येथे अरुण काशिनाथ बोर्डे, देऊळगाव धनगर येथे समाधान रंगनाथ खंडारे व कचरू बावसकर वीज पडून जखमी झाले. रोहिणखेड येथील महिला वादळी वाऱ्यामुळे तसेच वरदडा येथील घरावरील पत्रे पडून गोदावरी आनंदा गवई ही महिला गंभीर झाली, तर ५ जून रोजी देऊळघाट येथे वादळामुळे उडालेली पत्रे लागल्याने ७ जण जखमी झाले.जिल्ह्यात सरासरी ४४ मिमी. पाऊस बुलडाणा जिल्ह्यात गत तीन दिवसात सरासरी ४४ मिमी पाऊस झाला. पावसाचे प्रमाण वेगवेगळ्या तालुक्यात कमी जास्त आहे. बुलडाणा ७० मिमी, चिखली ९६, देऊळगावराजा २४, सिंदखेडराजा २७.६, लोणार ४१, मेहकर ४१, खामगाव ३०.८, शेगाव २५, मलकापूर १२, नांदुरा २३, मोताळा १८, संग्रामपूर ५७, जळगाव जा.१०९ मिमी. पाऊस झाला. पावसामुळे पेरणीला होणार सुरुवात गत चार दिवसात जिल्ह्यात दररोज पाऊस बरसत आहे. बुधवारी पहाटे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पहाटे पाच वाजतापासून तर ८ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर पुन्हा रात्री दहा वाजताच्या सुमारास जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला. गत चार दिवसात जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. तसेच यानंतर आणखी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी पेरणीला सुरूवात करणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून, लवकरच पेरणीला प्रारंभ होणार आहे. बँकांमधून पैसे मिळत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांकडे बी - बियाणे खरेदी करण्याकरिता पैसे नसल्यामुळे पेरणीला विलंब होण्याची शक्यता आहे. यावर्षी लवकर आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. चार दिवसातील नुकसानाचा आलेखमृत- ०४जखमी - १५जनावरांचा मृत्यू - ०८प्रभावित घरे - २००पूर्णत: पडलेली घरे- २० पाच शाळांचे नुकसान४१५ गावांमध्ये विद्युत खांब तुटली, झाडे उन्मळून पडली.