शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कृषीमंत्री नसलेल्या राज्य सरकारला दुष्काळाचा गंध नाही- जयप्रकाश बाविस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:20 PM

शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला.

बुलडाणा: दुष्काळी परिस्थिती असतानाही गेल्या नऊ महिन्यापासून राज्याला पूर्ण वेळ कृषीमंत्री नाही, यावरून हे सरकार दुष्काळ व शेतकर्याप्रती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ हे सरकारमधील मंत्रीसंत्री राजकारण करण्यात मशगूल आहेत. त्यामुळे राजकारण गेले चुलीत पण जगाचा पोशिंदा शेतकरी आधी जगला पाहिजे. त्यासाठीच दुष्काळ व्यवस्थापन संहीता ही मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येऊन शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला.मराठी राजभाषा दिनीतरी किमान शेतकर्यांना समजले अशा आपल्या मराठी भाषेमध्ये २०१६ ची राज्याची दुष्काळ व्यवस्थापन संहिता उपलब्ध केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नी राज्यात आंदोलन करत असून दर सोमवारी राज्यातील दुष्काळजाहीर झालेल्या १५१ तालुकाक्यात निवेदने देऊन याबाबत मागणी करण्यात आली आहे. पण महिना उलटूनही अद्याप त्यादृष्टीने राज्य शासनस्तरावर याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. तिसर्या सोमवारी निदर्शने निवेदने देऊन राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये आंदोलने केल्यानंतर चौथ्या सोमवारी यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तराव माहिती अधिकार टाकून ही मागणी करण्यात आली आहे.दुष्काळाच्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिनापर्यंत ही दुष्काळ व्यवस्थापन संहिता मराठीमध्ये उपलब्ध न केल्यास तथा दुष्काळी भागात गुरांसाठी चारा छावण्या उभारण्यासोबतच, चारा उत्पादनासाठी प्रयत्न, वृद्धनिराधारांसाठी अशा तालुक्यात स्वयंपाकगृह, रोहयो, मनरेगाची मागे उपलब्ध करून न दिल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. शासन उपाययोजना करण्यात कमी पडत असले तर मनसेचे तालुका व जिल्हास्तरावर प्रत्येकी पाच प्रतिनिधी देऊन यासाठी शासना आम्ही सहकार्य करू. पण त्यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ जाहीर होऊन साडेतीन महिने होऊनही अद्याप  उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत. त्या हाती घेण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला. तर तीव्र आंदोलननिवेदने, निदर्शने करून लोकशाही मार्गाने आम्ही राज्यात आंदोलन करत आहोत. खळखट्याक, कायदा हातात घेऊन विध्वंसक आंदोलन आम्ही आंदोलने करतो असा आमच्यावर आरोप होतो. मात्र महिन्यांतरही आम्ही दिलेल्या निवेदनांची दखल घेतल्या जात नसले तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मनसे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMNSमनसे