पावसाविना मृगनक्षत्रास प्रारंभ
By Admin | Updated: June 15, 2014 00:44 IST2014-06-15T00:36:47+5:302014-06-15T00:44:38+5:30
शेतकर्यांना पावसाच्या आगमनाची आस लागली असून मागील वर्षीचा कटु अनुभव पाहता तालुक्यातील शेतकर्यांनी या वर्षी धुळ पेरणीची जोखीम पत्करली नाही.

पावसाविना मृगनक्षत्रास प्रारंभ
मोताळा : मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येला किंवा सुरूवातीला हमखास पडणार्या पावसाने यावर्षीही पाठ फिरविल्याने शेतकर्यांना पावसाच्या आगमनाची आस लागली असून मागील वर्षीचा कटु अनुभव पाहता तालुक्यातील शेतकर्यांनी या वर्षी धुळ पेरणीची जोखीम पत्करली नाही. रोहिणी नक्षत्रानतंर मृगनक्षत्राचे सहा दिवस उलटले तरी पावासाने हजेरी लावली नसल्याने शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे करून आकाशाकडे डोळे लावले आहे. तालुक्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबुन असून वर्ष भराच्या नियोजनाबरोबरच सतत अडथळे येत असले तरी तालुक्यातील शेतकरी त्यावर मात करीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणाला कोणताही उपाय जरी नसला तरी मागील काही वर्षापर्यंत परिसरातील शेतकरीवर्गाने हतबल न होता शेतीचे नियोजन करून आपली फरफट थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पावसाच्या दगाबाजीमुळे शेतीचे नियोजन संपूर्ण कोलमडत आहे. या वर्षी तालुक्यातील शेतकरी वर्गाने धुळ पेरणीची जोखीम पत्करली नसून ज्यांच्याकडे सिचंणाची सुविद्या आहे अश्याच शेतकर्यांनी ठिबक वर कापसाची लागवड केली. मृगनक्षत्रात आतापर्यंत वेळेवर पावासाचे आगमन झाल्यामुळे धुळ पेरणी साधल्याही गेली, मृगनक्षत्रला सुरूवात होवून सहा दिवस झाले तरी तालुक्यात पावासाचा थेंब पडलेला नाही. उलट कडक उन्हाळा जाणवत आहे. या वर्षी सुरूवात कोरडी झाल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत असून मृगनक्षत्राच्या या कोरडेपणामुळे शेतीकामास उशीर होत आहे. मृगाचा पहिला पाऊस पडल्यानतंरची महत्वपूर्ण कामे पाण्याअभावी कामे थांबली आहेत. तालुक्यात खरीप पेरणीचे क्षेत्र ५0 हजार २00 हेक्टर असून खरीपात सर्वाधिक लागवड कापसाची केली जाते. काळानुरूप अर्थिक संकटावर मात करण्यासाठी शेतकर्यांनी पिक लागवडीत मोठे बदल केले आहेत. या वर्षी सर्वाधिक लागवड सोयाबीनची केली जात आहे. कापूस एक व सोयाबीन दोन क्रमांकावर आहे. पावसाचा लहरीपणा व बाजारात नगदी पिकाला मिळणार्या भावामुळे शेतकर्यांचा कल यावर्षीही सोयाबीन व कापसाकडेच जात आहे.
** शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत उष्णतेची तमा न बाळगता पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकर्यांनी केली असून मृगाकडे शेतकर्यांचे डोळे लागले आहेत. मृगनक्षत्रावरच शेतक र्यांची भिस्त असते. मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात समाधानकारक पाऊस झाला तर पेरण्या साधतात. यावर्षी देखील असे होईल म्हणून मृगाच्या आशेवर शेतकर्यांनी शेतीची कामे आटोपून खत, बियाणे खरेदी करून ठेवले आहे. यावर्षीच्या मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे पाऊस जास्त पडेल अशी धारणा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांचा लपंडाव दिसत आहे. त्यामुळे मृगाचा पाऊस लांबल्याची भावना शेतकरीवर्गात निर्माण झाली असून प्रत्येक जण पावसाच्या प्रतीक्षेत आहे.