शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:33 IST

खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.खामगाव मतदार संघातील बहुतांश भाग हा अवर्षण ग्रस्त म्हणून ओळखला जातो. हा डाग पुसून टाकण्यासाठी खामगांव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड आकाश फुंडकर यांनी प्रयत्न सुरु केले. निम्न ज्ञानगंगा प्रकल्प मागील अनेक वषार्पासून रखडला होता. हा प्रकल्प पुर्ण व्हावा हे दिवंगत लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १६० कोटी रुपये मंजूर करुन घेतले होते. यामाध्यमातून याठिकाणच्या कुटूंबाच्या पुनर्वसनाचा तसेच शेतक-यांच्या जमीनीच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यातून नवीन नियमानुसार हया शेतक-यांना ४ ते ५ पट मोबदला देण्यात आला आहे. हया प्रकल्पामुळे ११८१ हेक्टर म्हणजेच जवळपास ३००० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यातून २२ ते २५ गावांना याचा फायदा होऊन सिंचनामुळे हजारो शेतकरी कुटूंबाच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थीक उन्नती होणार आहे. मागील तीन ते चार दशकानंतर हा पहिलाच प्रकल्प आहे. जो सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे पुर्णत्वास गेला आहे. लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे हे स्वप्न आज पुर्ण होत असून या प्रकल्पात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. सद्या मतदार संघात दमदार पाऊस झाला असून त्यामुळे हया प्रकल्पात जवळपास १ ते २ कि.मी पर्यंत पाणी साठलेले दिसत आहे. हया धरण क्षेत्रातील मोठ मोठी झाडे आता पाण्याखाली जात आहेत. हया प्रकल्पामुळे परिसरातील जमीनीतील पाणीसाठा वाढणार आहे. खामगांव परिसरात जवळपास तीन ते चार दशकानंतर हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यात आज मोठया प्रमाणात पाणी साठवणुक होऊन संपुर्ण परिसर जलमय होणार आहे. तसेच हयाठिकाणी बुलढाणा रस्त्यावरील जुना पुल लवकरच पाण्याखाली जाणार आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण