शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

देशात स्थिर सरकार येणार अन् राजा कायम राहणार; भेंडवळ घटमांडणीचं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 07:58 IST

साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे.

भेंडवळ - साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत. त्यामुळे राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर सरकार येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तसेच घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं, असंही भाकीत मांडण्यात आलं.  

भेंडवळने पिकांबाबत असा अंदाज वर्तवला की, अंबाळी - मोघम, रोगराई नाही. कापूस - मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल. ज्वारी - पीक सर्व साधारण येईल, भावात तेजी मात्र राहणार नाही. गहू - पीक मोघम स्वरुपाचे राहिल. तांदूळ - मोघम उत्पादन होईल. तूर - पीक चांगलं राहिल. मूग - मोघम उत्पादन राहिल. उडीद - सर्वसाधारण उत्पादन राहिल. तीळ - मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल. भादली - रोगराई शक्य. बाजरी - उत्पादन सर्व साधारण असले तरी भावात तेजी राहिल. हरभरा - सर्व साधारण स्वरुपाचे उत्पादन राहिल. पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले.  त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील असा अंदाज आहे. 

गटातील चारा-पाण्याची प्रतीक असलेली चांडोली कोरडी गायब आहे. त्यामुळे भीषण चारा टंचाई यावर्षी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी गुराढोरांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गटातील घागरीवर असलेली पुरी गायब आहे त्याचा अर्थ पृथ्वीवर अनेक संकटे येतील, सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य. चारा-पाण्याची टंचाई येईल तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आहे म्हणजेच अर्थव्यवस्था डगमगेल आर्थिक ताण देशावर येईल. परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल. परंतु त्याला मात्र आपले संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल अशा प्रकारे एकंदर आजची भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तविली आहे. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह लोकप्रतिनिधीसह पंचक्रोशीतून हजारो शेतकरी येथे उपस्थित होते.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्था