शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर फेकले सोयाबीन, कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:45 IST

त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वा त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीन व का पूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. स्वाभिमानीने अचानक  केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देकापूस, सोयाबीन प्रश्नी विदर्भ, मराठवाड्यात आंदोलन तीव्र  करणार - तुपकर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकर्‍यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा अत्यंत  कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची सरकारकडून सर्रास  लूट केल्या जात आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वा त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीन व का पूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. स्वाभिमानीने अचानक  केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर  कडाडून टीका करीत सोयाबीनला किमान ६ हजार तर कापसाला  किमान ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव न दिल्यास येत्या काळात  संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात आंदोलन तीव्र करू, असा इशारा  यावेळी दिला. राज्य सरकारने यावर्षी सोयाबीनला ३ हजार ५0 रु पये हमी भाव जाहीर केला; मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांचे सोयाबीन  जेमतेम १८00 ते २ हजार रुपयांपर्यंत विकल्या जात आहे.  यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट  झाली आहे. त्यातच हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी  केल्या जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत् पादन खर्चसुद्धा निघणो कठीण झाले आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबर  रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी  राणा चंदन, भगवानराव मोरे, शे.रफिक, बबनराव चेके यांच्यासह  अन्य पदाधिकारी शेतकर्‍यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शे तकर्‍यांनी सोबत आणलेले सोयाबीन व कापूस रस्त्यावर फेकून  आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, एकूण खाद्य  तेलापैकी सोयाबीन तेलाचा वाटा २.६0 टक्के आहे आणि भारत हा  सोयाबीन तेल आयात करणारा सर्वांत मोठा देश आहे. दोन वर्षां पूर्वी याच सोयाबीनला ३५00 ते ४५00 भाव होता. आज जेम तेम २ हजार ते २२00 रुपये भाव मिळत आहे. म्हणजे उत्पादन  खर्चही निघणे कठीण झाले आहे. गुजरातमध्ये कापसाला बोनस देतात, मग महाराष्ट्रात का नाही?  असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मागील दहा वर्षात  १४५.२ लाख टन म्हणजे ६९ हजार २00 कोटी रुपयांचे  सोयाबीन भारताने आयात केले आहे. सन २0१४-१५ व  २0१५-१६ या दोन वर्षात २२ हजार ३00 कोटी रुपयांचे  सोयाबीन आयात केले. गेल्या तीन वर्षात सोयाबीन मोठय़ा  प्रमाणात आयात झाल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर जाणीवपूर्वक  पाडल्या जात असल्याचे तुपकर म्हणाले. येत्या काळात सोयाबीन  व कापूस प्रश्नावर संपूर्ण विदर्भात आंदोलन पेटवू, असा इशारा  रविकांत तुपकर यांनी दिला. या आंदोलनात राणा चंदन,  भगवानराव मोरे, बबनराव चेके, शे.रफीक शे.करीम, पं.स.सदस्य  नंदिनी कल्याणकर, भारत वाघमारे, नितीन राजपूत, प्रदीप शेळके,  गजानन तायडे, पुरुषोत्तम तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी  सहभागी झाले होते. 

‘टीका करण्यापेक्षा भाव द्या’!‘‘लोक सतत आमच्यावर टीका करतात. त्यांनी टीका केल्यापेक्षा  सोयाबीनला भाव द्यावा. आम्ही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सतत रस् त्यावर लढणारे कार्यकर्ते आहोत. तथापि, मी व माझे सहकारी या पुढे ताकदीने ही लढाई लढून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार  आहे. १७ गावातील जळालेले ट्रान्सफॉर्मर आपण  अधिकार्‍यांकडून लावून घेतले. तूर घोटाळय़ातील व्यापार्‍यांवर  गुन्हे दाखल करुन घेतले तर उद्योगपतींचे कर्ज माफ करणार्‍या  सरकारला शेतकरी कृषी पंपाची सक्तीची वसुली करताना काहीच  वाटत नाही का’’, असा सवाल रविकांत तुपकर यांनी यावेळी उ पस्थित केला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी