शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक वखरले!

By admin | Published: July 01, 2017 12:00 AM

बुलडाणा : तालुक्यातील धाड परिसरात सोयाबीन पीक पिवळे पडून त्याची वाढ खुंटली असल्याने शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन पीक वखरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : वेळेपूर्वी आणि दमदार स्वरूपात होणाऱ्या पावसाने खरीप हंगाम मार्गी लागला असून, यावर्षी पावसाअभावी होणारी दुबार पेरणी टळली आहे. मात्र, सध्या बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर हळदीसारखे पिवळे पडून त्याची वाढ खुंटली असल्याने धाडनजीकच्या बोरखेड (धाड) या गावाच्या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन पीक वखरले आहे. खरीप हंगामात सर्व पीक परिस्थिती चांगली असताना सोयाबीन पिकावर संक्रांत आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिवळे पडल्याने शेतकरी हैराण झाला आहे. बोरखेड (धाड) येथील गजानन रामदास जाधव यांनी दोन एकर, रामदास कोंडुबा वाघ एक हेक्टर, रामदास बावस्कर एक एकर, संजय शिंदे एक एकर, तेजराव बावस्कर एक एकर, इचारे बावस्कर दोन एकर, संदीप बावस्कर एक एकर, असे अनेक शेतकऱ्यांनी पिवळे झालेले सोयाबीन वखरून टाकले, तर इतर शेतकरी सोयाबीनवर औषधी फवारून प्रतीक्षा करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनवर खोडमाशी व लोह कमतरेवर ट्रायझोफॉस ४० एमएल प्रती १० लीटर पाणी व फेरस सल्फेट १०० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी, चुन्याचे निवळीत वापरावे व फवारणी करावी. -सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ