शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काही भाग तहानलेलाच!

By admin | Updated: September 3, 2014 23:39 IST

खामगावातील विस्कळीत पाणीपुरवठा आंशिक सुरळीत; मात्र, अद्याप शहरातील बहुतांश भाग तहानलेलाच

खामगाव : गेल्या चौदा-पंधरा दिवसांपासून विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासनाला अखेर आज यश आले. मात्र, अद्यापही शहरातील बहुतांश भाग तहानलेलाच आहे. त्यामुळे ऐन गौरी-गणपतीत शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गौरी- गणपतीची घरगुती स्थापना करणार्‍या नागरिकांसह काही गणेश मंडळांना महाप्रसादासाठी पाणी विकत घेण्याची वस्तुस्थिती शहराच्या अनेक भागात अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलवाहिनीचा काही भाग पुरात वाहून गेला. त्यामुळे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपेक्षा शहरातील सर्वच भागात पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरासह फरशी, शिवाजी नगर, दाळ फैल, सिव्हील लाईन, शंकर नगर, चांदमारी, वामन नगर, हरिफैल या भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले. गौरी-गणपती सारख्या महत्वपूर्ण सणासुदीच्या काळात अनेक भागातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्यामुळे गणेश मंडळांसह नागरिकांना चांगलेच हतबल व्हावे लागले. दरम्यान, आज बुधवारी फरशी, भोईपुरा, जैन मंदिर परिसरात पाणी पुरवठा सुरळीत झाला. मात्र, संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शंकर नगर, सिव्हील लाईन, चांदमारी, वामन नगर, हरिफैल, सर्मथ कॉलनी, गजानन कॉलनी, यशोधाम कॉलनी, एस.टी.डेपो मागील परिसरासह काही भागातील पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.युद्धपातळीवर दुरुस्तीअतिदुर्गम भागात वाहून गेलेली पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाला चांगलेच प्रयत्न करावे लागले. पाऊस बंद झाल्यानंतर लागोपाठ २७ तास परिश्रम करून पालिका प्रशासनाने पाईपलाईनची दुरूस्ती केली. त्यामुळे आज पहाटे वामन नगर आणि घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचले. त्यानंतर टाईमटेबलनुसार विस्कळीत झालेल्या भागात पाणी पुरवठय़ासाठी आज प्राधान्य देण्यात आले. युध्द पातळीवर प्रयत्न करून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. काही भागात पाणी पोहोचले नाही, ही वस्तुस्थिती आहे. लवकरच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.- अशोकसिंह सानंदानगराध्यक्ष, खामगाव.सणासुदीच्या काळात नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ही दुर्देवी बाब आहे. तात्काळ पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. -गणेश मानेमाजी नगराध्यक्षअतिशय प्रतिकुल परिस्थितीत मुख्य पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली. २७ तास लागोपाठ काम करून पाईपलाईनची दुरूस्ती केली. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - संजय मोकासरेउप अभियंता, न.प. खामगाव