कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:00 IST2017-07-31T01:00:08+5:302017-07-31T01:00:13+5:30

चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

Solve the neglected debt problems positively | कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

ठळक मुद्देशिवराणा मित्रमंडळाची ना. फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. याची दखल घेत कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींचा सकारात्मक विचार करून त्यांची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत ना. भाऊसाहेब फुंडकर यांना २९ जुलै रोजी माजी जि.प. अध्यक्ष तथा शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी त्यांना कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींविषयी माहिती देऊन शिवराणा मित्रमंडळाच्यावतीने निवेदन सादर केले. या निवेदनात सन २००७ ते २००९ या कालावधीतील कर्जमाफीपासून वंचित बहुधारक शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात यावे, सिलिंग कायद्याच्या भीतीने अनेक शेतकºयांनी शेतीची वाटणी कुटुंबातील सदस्यांमध्ये (खातेफोड) केली असल्याने ते सदस्य बँकेचे स्वतंत्र कर्जदार सभासदसुद्धा झालेत; परंतु शासनाने कुटुंबाची व्याख्या करून केवळ एका व्यक्तीला (कुटुंब प्रमुख) दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली व इतर सदस्य जे कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे किंवा १८ वर्षावरील असले तरी विभक्त कुटुंब रेशनकार्ड न केल्यामुळे केवळ एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळाली असल्याने प्रत्येक खातेदाराला कर्जमाफी देण्यात यावी, शासनाने कर्जमाफीची अट ३० जून २०१६ चे थकीत शेतकरी ही ठेवली आहे. तरी ही कर्जमाफी त्यांच्यावर अन्याय करणारी ठरत असल्याने कर्जमाफीची अट ३० जून २०१७ करण्यात यावी व जिल्ह्यातील शेतकºयांचे सन २०१३ ते १५ दरम्यानचे थकीत सूक्ष्म सिंचनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे आणि पीक विम्याची ३१ जुलै २०१७ ची मुदत वाढविण्यात येऊन पीक विम्याचे अर्ज आॅफलाइन स्वीकारावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवराणाचे श्रीकिसन धांडगे, विलाससिंह सुरडकर, नाना पवार, राजेश झगरे, सखाराम पाटील, शिवाजी पवार, विनायक पडघान, अ‍ॅड. अनिल कºहाडे, विठ्ठलराव करवंदे आदींसह तालुकाभरातील १२३ शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Solve the neglected debt problems positively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.