शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

शेतक-यांना एसएमएसचा फायदा

By admin | Updated: January 28, 2016 00:59 IST

१ लाख ७0 हजार शेतक-यांची झाली योजनेअंतर्गत नोंदणी.

खामगाव : हवामानातील बदलामुळे कृषी क्षेत्रात सध्या काहीसी चिंता व उत्पादनात अनियमितता आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हवामान बदल तथा पीकांवर येणार्‍या कीडीच्या प्रादुर्भावाबाबत अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने जून २0१५ पासून किसान एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या कक्षेत जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्री आता आले आहेत. परिणामी शेतकर्‍यांना पीक पाण्याविषयी सविस्तर व अचूक माहिती थेट पोहोचत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातही आता अधुनिकीकरणाने प्रवेश केला आहे. गेल्या दोन वर्षापासून हवामानातील बदलामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अभूतपूर्व गारपीट, अवकाळी पाऊस अवर्षण असे चक्र गेल्या काही वर्षापासून सुरू झाल्याने शेतीक्षेत्र प्रभावीत झाले आहे. त्यातच योग्य वेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला खास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावल्या जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हवामान बदलाची अचूक माहिती तथा पीकांवर येणार्‍या किडीचे योग्य वेळी व्यवस्थापन केले जावे यासाठी थेट शेतकर्‍यांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यास पाच लाख ४८ हजारांच्या आसपास शेतकरी असून त्यापैकी एक लाख ७0 हजार ८६२ शेतकर्‍यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची या उपक्रमातंर्गत आतापर्यंत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील एकूण शेतकर्‍यांशी तुलना करता जवळपास ३१ टक्के शेतकरी यामध्ये समाविष्ट झाले आहे. त्यांना आता कृषी विषयक सल्ला थेट एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे.