शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:06 IST

तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. खकडपूर्णा प्रकल्पात ८४.३४ टक्के जलसाठा असून पेनटाकळी प्रकल्पाचा जलसाठा ७८.७७ टक्यांवर पोहचला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावळी १०० टक्यांवर पोहचले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. २९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावणी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे २० से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात १९.४६ घनमिटर प्रती सेकंट इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच वक्रद्वारे ३० से.मी न उघडण्यात आली आहेत.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराजिल्ह्यातील दोन मोठ्या आणि सहा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहेत. त्यामुळे, नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाउस सुरू असल्याने जलपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७.२ मिमी सरासरी पाउस झाला आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण