शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

श्वासानंद माऊलींच्या ९० वर्षापूर्वीच्या भ्रमंतीला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 18:00 IST

श्वासानंद माऊलींच्या ९० वर्षापूर्वीच्या या भ्रमंतीला त्यांच्या भक्तवर्गांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: महाराष्ट्र ही संतांची भूमी  म्हणून ओळखली जाते. परंतू या संतांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत नव्हे तर, भारतभर दिसून येते. महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या  मेहकरच्या श्वासानंद माऊलींनी गेल्या शतकात ‘गंगा बहती भली, साधू घूमता भला’ या म्हणीप्रमाणे काशीला संजीवन समाधी घेईपर्यंत अखंड संचार केला. श्वासानंद माऊलींच्या ९० वर्षापूर्वीच्या या भ्रमंतीला त्यांच्या भक्तवर्गांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. समाजामध्ये जातीभेद, उच्चनीच, गरीब-श्रीमंत यांची मोठी दरी निर्माण झालेली असताना विविध जातीत जन्माला आलेल्या संतांनी ही विषमतेची दरी दूर करण्याचे मोठे काम केले. धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कामही या संत परंपरेकडून करण्यात आले. महाराष्ट्रात असे अनेक संत आढळून येतात. त्यातीलच एक प्रमुख संत श्वासानंद माऊली हे आहेत. मेहकर ही जन्मभूमी असलेले श्वासानंद माऊली उर्फ संत बाळाभाऊ महाराज पितळे यांना त्यांच्या धार्मिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणूनही ओळखले जाते. मेहकरच्या श्वासानंद माऊलींनी १९२५ ते ३० च्या कालखंडामध्ये शिष्टमंडळींना सोबत घेऊन भक्तीमार्गाच्या प्रसारासाठी भारतभरच नव्हे तर नेपाळपर्यंत भ्रमंती केली. ही एक एैतिहासिक आणि दखलपा वेगळेपणा असलेली बाब आहे. ‘चरैवेती, चरैवेती’ या वेदमंत्राप्रमाणे त्यांनी काशीला संजीवन समाधि घेईपर्यंत अखंड संचार केला. श्वासानंद माऊलींनी काशि येथे संजीवन समाधी व प्रयाग येथे ‘करतल भिक्षा, तरूतल वास’ हे व्रत केले. चित्रकूट येथे गुहेमध्ये त्रिदंडी सन्यास, ओंकारेश्वर येथे दिव्य ग्रंथ तोंडी सांगितला. तर बद्रिनारायण येथे तो ग्रंथ शिष्याकरवी लेखनबद्ध केला. महेश्वर जंगलामध्ये तपश्चर्या, इंदूर येथे महाराणी अहिल्याबाई होळकरांचे राजवारस श्रीमंत मार्तंडराव होळकर हे यांचे शिष्य होते. त्यांच्या राजवाड्यात चातुर्मास, हिमालयात साधु-संतांच्या भेटी, नोपाळची राजधानी काठमांडू येथील राजघराण्याकडून ‘पार्थीव लिंग पूजनाचा’ सन्मान महाराजांना मिळाला. महाराजांच्या भ्रमंतीला उजाळा देण्यासाठी श्वासानंद माऊलींचे चौथे उत्तराधिकारी गुरूपिठाधिश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या प्रेरणेने गुरूभक्तांनी मागील आठवड्यात सर्व स्थळांना भेटी दिल्या. या सर्व गावातील वयोवृद्धांनी त्यांच्या आठवणी अद्यापही जपलेल्या आहेत. 

 उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात भक्तवर्ग अधिकमेहकर येथील श्वासानंद माऊली यांचा भक्तवर्ग हा उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश मध्ये सर्वाधिक असल्याचे गुरूभक्तांनी सांगितले. काशिला महाराजांची संजीवन समाधी असल्यामुळे तो केंद्रबिंदू मानून पहिल्या टप्प्यात काशिच्या अलिकडील स्थळांना या गुरूभक्तांनी भेटी दिल्या. तर पुढील टप्प्यात काशीच्या पलीकडील स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती गुरूभक्तांनी दिली. या भेटीदरम्यान महाराजंचे अनेक कार्य समोर आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर