शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘त्या’ ९० हजार शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्यावे -  सहकार आयुक्तांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:57 IST

गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या.

- नीलेश जोशीबुलडाणा: कर्जमाफी मिळालेल्या परंतू पीक कर्जापासून गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का अवघा ३४.१५ टक्के होता. त्यामुळे यंदा राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकांनी प्राधान्याने या शेतकºयांपर्यंत पोहेचून त्यांना पीक कर्ज द्यावे असे सहकार आयुक्तांनी अधोरेखीत केले आहे. मुळात कर्जमाफी मिळालेल्या १०० टक्के शेतकºयांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा येथील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत चार जून रोजी सहकार आयुक्तांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची स्थिती जाणून घेतली. त्यावेळी गत वर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तथा व्यापारी बँकांनी तब्बल ९० हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असतानाही त्यांना पीक कर्ज दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यावेळी ही बाब गांभिर्याने घेत सहकार आयुक्त सतिश सोनी बँकाना उपरोक्त निर्देश दिले आहेत. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक उत्तम मन्वर, जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित होते.कर्जमाफी मिळाली त्यांना पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्षी त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहले होते. बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकरी वर्गच बँकांकडे अ‍ॅप्रोच झाला नसल्याचे सांगताच सहकार आयुक्तांनी बँकानी स्वत: अशा शेतकºयांकडे अ‍ॅप्रोच होऊन त्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले. पीक कर्जाचा मुुद्दा बँकांनी अत्यंत गांभिर्याने घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या असल्याचे या बैठकीस उपस्थित असलेल्या सुत्रांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने ग्रामीण बँका व व्यावसायिक बँकांनी कर्जमाफी मिळालेले शेतकरी १०० टक्के कव्हर केले नसल्याचेही सहकार आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले. परिणामस्वरुप गेल्या  खरीप हंगामात एक हजार ७४५ कोटींचे उदिष्ट असताना अवघे  ५९६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले. त्याचा टक्काही अवघा ३४.१५ टक्के होता. २०१५-१६ आणि २०१६-१७ अनुक्रमे ७५ टक्के व ७८ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. ते पाहता यंदा  गतवर्षीसारखा प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी सुचीत केले.

कर्जमाफी मिळालेल्या १०० टक्के शेतकºयांना बँकांनी पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिले आहेत. जिल्हा बँकेतील कर्जमाफी मिळालेल्या २२ हजार शेतकºयांना राष्ट्रीय बँका तथा व्यापारी बँकांकडू पीक कर्ज देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने आम्ही तसे सर्टीफाईड करून दिलेले असल्याने या शेतकºयांना पीक कर्ज मिळण्यात अडचण जाणार नाही. ८१७ गावातील या शेतकºयांची नावे सर्टीफाईड करून राष्ट्रीयकृत बँकांकडे दिल्या गेली आहेत.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा