शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

शौचालय वापरात शेगाव, संग्रामपूर अव्वल!

By admin | Updated: February 12, 2016 02:05 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्याचे ५१ टक्के उद्दिष्ट पूर्ण.

खामगाव: शौचालय निर्मितीच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने जिल्ह्यातील तालुक्यांनी वेग घेतला असला तरी २0१५-१६ या वर्षाच्या उद्दिष्टाचा विचार करता शेगाव व संग्रामपूर तालुक्यांनी शौचालय निर्मितीसोबतच शौचालयांच्या वापरामध्ये आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांनी चालू आर्थिक वर्षात प्राप्त उद्दिष्ट्याच्या ५0 टक्क्यांपेक्षा अधिक शौचालयांची निर्मिती करत स्वच्छ भारत अभियानास (ग्रामीण) प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, त्यामुळे जिल्हा राज्यात सध्या सातव्या स्थानावर असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन कक्षातील सूत्रांनी दिली. ऑक्टोबर २0१४ पासून जिल्ह्यात सध्या स्वच्छ भारत मिशनचा बोलबाला सुरू असून, २0१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींमध्ये ३६ हजार ६२७ शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी प्रत्यक्षात आतापर्यंंत १८ हजार ८0९ शौचालयांची निर्मिती भारत स्वच्छता मिशनअंतर्गत करण्यात आली आहे. एकूण उद्दिष्टाच्या ती ५१.३५ टक्के आहे. असे असले तरी तालुकानिहाय कामाच्या पूर्ततेची पाहणी केली असता आठ तालुक्यांनी ५0 टक्क्यांच्या वर उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा हा शौचालय निर्मितीच्या बाबतीच राज्यात सध्या सातव्या स्थानावर असल्याचे जिल्हा परिषदेमधील संबंधित कक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. नगर जिल्हा प्रथम, अकोला द्वितीय, अमरावती तिसर्‍या, औरंगाबाद चौथ्या, बीड पाचव्या तर भंडारा सहाव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्यात ४६.२0 टक्केच नागरिक शौचालयाचा वापर करत असल्याचे समोर आले होते; मात्र यावर्षी जिल्ह्यातील २१८ गावात शौचालयांची निर्मिती झाल्याने ही टक्केवारीही आता ५0 टक्क्याच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षाचा या उपक्रमाचा विचार करता जिल्ह्यात सध्या समाधानकारक काम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.