सात गावे भूस्खलनाच्या छायेत!
By Admin | Updated: August 3, 2016 00:21 IST2016-08-03T00:21:24+5:302016-08-03T00:21:24+5:30
जास्त पावसामुळे धोका वाढला: प्रशासकीय स्तरावर कोणत्याही उपाययोजना नाहीत!

सात गावे भूस्खलनाच्या छायेत!
बुलडाणा: मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि.मी.चा वळणदार घाट शहराला लाभला आहे. शहराच्या चारही बाजूंनी अजिंठा डोंगर आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे; मात्र पावसाळ्यात या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सात गावांना कधीही भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. यावर्षी होत असलेल्या अतवृष्टीमुळे हा धोका अधिकच वाढला आहे.
मलकापूर मार्गावरील असलेल्या राजूर घाटाच्या पायथ्याशी खडकी, खामखेड, मोहेगाव, खैरखेड, नळकुंड, हनवतखेड, कुर्हा या गावांशिवाय बर्याच लहान-मोठय़ा लोकवस्त्या वसलेल्या आहेत. या वस्तीमधील बरशे घर थेट डोंगराच्या अध्र्यापर्यंत चढलेले आहे; मात्र डोंगर मुरमाड खडकाचा बनला असून, अति पाऊस पडला की, माती भुसभुशीत होऊन खाली घसरण्याची शक्यता जास्त आहे. या गावांपैकी खडकी हे गाव सर्वाधिक असुरक्षित आहे. गावातील काही घरे थेट डोंगर पायथ्यावर चढलेली आहे. त्यामुळे या घरांना भूस्खलनाचा मोठा धोका आहे. ढगफुटी अथवा अधिक पाऊस पडला तर गावातील काही भागांना धोका पोहोचण्याची शक्यता जास्त आहे.
बंधार्याचा धोका
मोताळा तालुक्यात येणार्या खडकी गावाला तिन्ही बाजूला डोंगराचा वेढा आहे. गावापासून दीड किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत बंधारा आहे. बंधार्यातून एका लहान नाल्याद्वारे गावात पाणी येते. याच पाण्याचा वापर करुन ग्रामस्थ शेतीमध्ये पीक घेतात. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे या बंधार्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नाल्याद्वारे पाणी गावात शिरले. या पाण्याचे शेतातील उभे पीक झोपवली आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते.
पाण्याचे लोंढे येतात गावात
कधी अतवृष्टी झाली तर, डोंगर माथ्याहून पाण्याचे मोठे लोंढे थेट या गावात वा शेतात उतरतात, बर्याचवेळा पाण्याचा मोठा प्रवाह आला की, शेती खरडून निघणे वा घराची पडझड होण्याची शक्यता असते.