शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाटपावरून बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:35 IST

नांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली.

ठळक मुद्देनळगंगा प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना मिळणार पाणी रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली. सरतेशेवटी तीन पाणी पाळ्यांवर सर्वांचे एकमत झाले.प्रकल्पाव्दारे मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतीकरीता कॅनालव्दारे पाणी उपलब्ध होत असते. धानोरा (वि.), उमाळी व नळगंगा अशा तीन सिंचन शाखाअंतर्गत ३२ पाणी वापर संस्थामार्फत वाटपाचे पाणी शेतीकरीता देण्यात येते. नळगंगा धरणात सध्या २८.७३ दलघमी जलसाठा असून त्यापैकी मार्गावरील ४.९५ दलघमी जलसाठा राखीव असून २३.९८ दलघमी जलसाठा वापरण्या योग्य आहे. यापैकी बाष्पीभवन ६.२७ दलघमी, पिण्याकरीता २.९२ दलघमी, कॅरीओव्हर ४.६0 दलघमी, तर इतर लॉसेस १.२0 दलघमी असा १४.९९ दलघमी पाणीसाठा  सध्या उपलब्ध आहे. त्यापैकी जलाशय उपसा (मोटारीव्दारे) 0.८४ दलघमी तर कॅनालव्दारे ८.१५ दलघमी जलसाठा शेतीसाइी वापरता येणार आहे. जलाशय उपसा (मोटारीव्दारे) २१0 हेक्टर तर कॅनालव्दारे ८१५ हेक्टर क्षेत्र ओलीत करता येणार आहे. प्रकल्पाअंतर्गत असणार्‍या नळगंगा सिंचन शाखा २४५ हे. उमाळी सिंचन शाखा ३२५ हेक्टर, तर धानोरा सिंचन शाखेला २४५ हे. क्षेत्रफळ ओलीताचे उद्दीष्ट असून दोन पाणी पाळ्या देण्यात येणार असल्याचे नळगंगा प्रकल्प प्रशासनाने सांगितले असता सर्वच ३२ पाणी वापर संस्थांनी क्षेत्रफळ कमी करून चार पाणी पाळ्या देण्याची मागणी केली. परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे किमान तीन पाणी पाळ्या द्याव्यात अशी मागणी पाणीवापर संस्थांनी केली. यावर दोन्ही बाजुंनी साथक-बाधक चर्चा होवून उपलब्ध पाणी साठय़ानुसार तीन पाणी पाळ्या देण्यावर सर्वांचे एकमत झाले. सदर रब्बी हंगाम पाणी नियोजन बैठक पाटबंधारे उपविभाग मलकापूरचे उपविभागीय अधिकारी जी.आर. अग्रवाल, नळगंगापूर सिंचन शाखाधिकारी व्ही.आर. राजपूत, अभियंता आर.डी. पाटील यांचे उपस्थितीत पार पडली.

पाणी वाटपाबाबत साशंकताच !मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नळगंगा प्रकल्पाचा कारभार सध्या प्रभारींच्या खांद्यावर असून धानोरा सिंचन शाखाधिकारी नागरे रूजू झाल्यापासून रजेवर आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांचा प्रभार अग्रवाल यांचेकडे आहे. कार्यकारी अभियंताही सध्या प्रभारी असल्याने प्रकल्पाचे पाणी वाटप, नियोजनानुसार होईल की नाही यात शंकाच आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी