शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पाणी वाटपावरून बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:35 IST

नांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली.

ठळक मुद्देनळगंगा प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना मिळणार पाणी रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली. सरतेशेवटी तीन पाणी पाळ्यांवर सर्वांचे एकमत झाले.प्रकल्पाव्दारे मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतीकरीता कॅनालव्दारे पाणी उपलब्ध होत असते. धानोरा (वि.), उमाळी व नळगंगा अशा तीन सिंचन शाखाअंतर्गत ३२ पाणी वापर संस्थामार्फत वाटपाचे पाणी शेतीकरीता देण्यात येते. नळगंगा धरणात सध्या २८.७३ दलघमी जलसाठा असून त्यापैकी मार्गावरील ४.९५ दलघमी जलसाठा राखीव असून २३.९८ दलघमी जलसाठा वापरण्या योग्य आहे. यापैकी बाष्पीभवन ६.२७ दलघमी, पिण्याकरीता २.९२ दलघमी, कॅरीओव्हर ४.६0 दलघमी, तर इतर लॉसेस १.२0 दलघमी असा १४.९९ दलघमी पाणीसाठा  सध्या उपलब्ध आहे. त्यापैकी जलाशय उपसा (मोटारीव्दारे) 0.८४ दलघमी तर कॅनालव्दारे ८.१५ दलघमी जलसाठा शेतीसाइी वापरता येणार आहे. जलाशय उपसा (मोटारीव्दारे) २१0 हेक्टर तर कॅनालव्दारे ८१५ हेक्टर क्षेत्र ओलीत करता येणार आहे. प्रकल्पाअंतर्गत असणार्‍या नळगंगा सिंचन शाखा २४५ हे. उमाळी सिंचन शाखा ३२५ हेक्टर, तर धानोरा सिंचन शाखेला २४५ हे. क्षेत्रफळ ओलीताचे उद्दीष्ट असून दोन पाणी पाळ्या देण्यात येणार असल्याचे नळगंगा प्रकल्प प्रशासनाने सांगितले असता सर्वच ३२ पाणी वापर संस्थांनी क्षेत्रफळ कमी करून चार पाणी पाळ्या देण्याची मागणी केली. परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे किमान तीन पाणी पाळ्या द्याव्यात अशी मागणी पाणीवापर संस्थांनी केली. यावर दोन्ही बाजुंनी साथक-बाधक चर्चा होवून उपलब्ध पाणी साठय़ानुसार तीन पाणी पाळ्या देण्यावर सर्वांचे एकमत झाले. सदर रब्बी हंगाम पाणी नियोजन बैठक पाटबंधारे उपविभाग मलकापूरचे उपविभागीय अधिकारी जी.आर. अग्रवाल, नळगंगापूर सिंचन शाखाधिकारी व्ही.आर. राजपूत, अभियंता आर.डी. पाटील यांचे उपस्थितीत पार पडली.

पाणी वाटपाबाबत साशंकताच !मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नळगंगा प्रकल्पाचा कारभार सध्या प्रभारींच्या खांद्यावर असून धानोरा सिंचन शाखाधिकारी नागरे रूजू झाल्यापासून रजेवर आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांचा प्रभार अग्रवाल यांचेकडे आहे. कार्यकारी अभियंताही सध्या प्रभारी असल्याने प्रकल्पाचे पाणी वाटप, नियोजनानुसार होईल की नाही यात शंकाच आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी