अभयारण्यांची सुरक्षा धोक्यात
By Admin | Updated: December 6, 2014 00:06 IST2014-12-06T00:06:20+5:302014-12-06T00:06:20+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील तीन अभयारण्यात मानवी हस्तेक्षप वाढला.

अभयारण्यांची सुरक्षा धोक्यात
बुलडाणा : शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर या अभयारण्याची दैनावस्था होत असून, अभयारण्यातील मौल्यवान वनसं पदेसोबतच या अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार सरोवर असे तीन अभयारण्य आहेत. मात्र, केवळ शासनाचे दुर्लक्ष, स्थानिक प्रशासनाची अनास्था आणि संबंधित विभागाकडे असलेली अपुरी साधने यामुळे या अभयारण्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत चालली आहे. या अभयारण्यात असलेल्या प्राणी तसेच पशुपक्षांची संख्या घटत चालली आहे. याला जबाबदार शासन असले तरी, संबंधित विभागामध्येच घरभेदी निघत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठे ज्ञानगंगा अभयारण्य आहे. २0३५६.६0 हेक्टर क्षेत्रावर या अभयारण्याची व्याप्ती आहे. १२७११.२४ हेक्टरवर अंबाबारवा अभयारण्य तर सर्वात लहान २६६.00 हेक्टरवर लोणारच्या जगप्रसिद्ध खार्या पाण्याच्या सरोवराजवळ संरक्षित वन आहे. ज्ञानगंगा अभयारण्य हे तीन तालुक्यांत पसरलेले असून खामगाव व बुलडाणा या दोन मोठय़ा शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर आहे. जंगलातील मोठय़ा प्रमाणावर मौल्यवान वनसंपदा नष्ट होत चालली आहे. वृक्षतोड व जंगलातील औषधोपयोगी वनस्पतीची तस्करी केल्या जाते. याबरोबरच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या हरिण, रोही, काळविट, मोर, रानडुक्कर, लांडोर यासारख्या पशुपक्षांच्या शिकारीमध्ये वाढ होत आहे. परिणामी, प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. अभयारण्यात माणसांचा वावर नसावा असा नियम असताना ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रामध्ये आजही वस्त्या असलेली गावे आहेत. या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून पडून आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. मोठया प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने जंगलाचं देणं धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. हीच स्थिती लोणार सरोवर परिसरातील संरक्षित वनाची आहे. एकूणच जिल्ह्यातील अभयारण्य व संरक्षित वनाची शासनाच्या दुर्लक्षामुळे पार वाट लागली असून येणार्या काळात ही वनसंपदा नष्ट होऊ देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.