शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 14:54 IST

बुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या स्थितीचा राज्यस्तरीय पथकाकडून आढावा घेण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या स्थितीचा राज्यस्तरीय पथकाकडून आढावा घेण्यात येत आहे. शुक्रवारी या पथकाने सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांची पाहणी करून पाणी पुरवठ्याची स्थिती जाणून घेतली. भविष्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्याला प्रशासनाने आजपासूनच सुरुवात केली आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळाच्या कचाट्यात अडकला आहे. जिल्ह्यातील जलसे्रातांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील मोठ-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा खालावला असून, पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय पथक गुरुवारला बुलडाणा येथे दाखल झाले. सुरुवातीला बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड येथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी सिंदखेड राजा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये जाऊन पाणी टंचाईची स्थिती जाणून घेण्यात आली. त्यानंतर या राज्यस्तरीय पथकाने देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन पाणी पुरवठ्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. गावामध्ये पाण्याचे टँकर नियमित येते किंवा नाही, विहीर अधिग्रहण केलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली. या पथकामध्ये पाणी पुरवठा विभागाचे अवर सचिव प्र. वि. कानडे, मंत्रालयातील कक्षाधिकारी रेगे, एस. जे. तुमराव, आर. एस. पात्रे यांचा समावेश असून, पाहणी दरम्यान जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग व पंचायत समितीमधील अधिकारी हजर होते. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याच्या भीतीने आतापासून विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे व इतर पर्यायी सुविधांचा मार्ग शोधण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वादग्रस्त खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणीमराठवाड्यात पाणी नेण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील वादग्रस्त ठरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी पाणी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने शुक्रवारी केली. त्याचबरोबर परिसरातील ग्रामस्थांशी या पथकाने चर्चा करून त्यांच्या पाणी समस्या जाणून घेतल्या. राज्यस्तरीय पथकाने खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर सर्वांच्याच नजरा पथकाच्या अहवालाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई