शहरांमध्येही वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:43+5:302021-09-26T04:37:43+5:30

बुलडाणा : काराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात ८वी ते १२वीचे तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ...

School bells will also ring in the cities | शहरांमध्येही वाजणार शाळेची घंटा

शहरांमध्येही वाजणार शाळेची घंटा

बुलडाणा : काराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात ८वी ते १२वीचे तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ऑक्टाेबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी मार्गदर्शक सूचनाही शाळांसाठी शासनाने जारी केल्या आहेत. त्यामुळे, दीड वर्षानंतर प्रथमच शहरी भागात शाळेची घंटा वाजणार आहे.

काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्राम समितीच्या शिफारशीवरून शासनाने इयत्ता आठवी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात ९१९ पैकी ४८७ शाळा सुरू आहेत. काेराेनाच्या धास्तीने मुलांना पालकांनी शाळेत पाठविले नसल्याचे चित्र आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे. दीड वर्षापासून बंद असलेल्या शहरी भागातील शाळा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घाेषणा शासनाने केली आहे. शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा सुरू हाेणार असून, ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्गही भरणार आहेत. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून या शाळा सुरू हाेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील ४८७ शाळा आहेत सुरू

सध्या काेराेनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील ४८७ शाळा सुरू आहेत. एकूण ९१९ पैकी अर्ध्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच आहे. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे एकूण १ लाख ३१ हजार ७०७ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १९ हजार ७५३ विद्यार्थीच उपस्थित राहत आहेत. सर्वाधिक चिखली तालुक्यात ९१ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मेहकर तालुक्यात ७७ शाळा सुरू झालेल्या आहेत.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करावे.

विद्यार्थ्यांचे टेम्परेचर नियमितपणे तपासावे.

शक्य असल्यास इच्छुक डाॅक्टर पालकांची मदत घ्यावी.

सर्व शाळा आराेग्य केंद्राशी जाेडाव्यात.

हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आराेग्य केंद्रातील डाॅक्टर, परिचारिकांची मदत घ्यावी.

ही घ्यावी काळजी

मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्राेत्साहित करावे.

स्कूलबसमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करावा.

बसमध्ये चढताना, उतरताना वाहन चालक, विद्यार्थ्यांनी सॅनिटायझरचा वापर करावा.

शहरी भागातील इयत्ता आठवी ते १२वी व ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याविषयीची तयारी पूर्ण केली आहे़ बहुतांश शिक्षकांनी काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेतले आहेत. येत्या ४ ऑक्टाेबरपासून शहरी भागातही शाळा सुरू हाेणार आहेत.

सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. बुलडाणा

जिल्ह्यातील एकूण ८वी ते १२वीच्या शाळा

९१९

सध्या सुरू असलेल्या शाळा

४८७

एकूण ८वी ते १२वीचे विद्यार्थी

१,३१,७०७

सध्या उपस्थित असलेले विद्यार्थी

१९,७५३

Web Title: School bells will also ring in the cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.