शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

योजना दोन कोटींची; पण नळाला दोन थेंब पाणी येईना... 

By विवेक चांदुरकर | Updated: July 13, 2024 15:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कघारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपासून गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

घारोड येथे गेल्या २२ नोव्हेंबर रोजी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळयोजना व पाण्याची टाकी, असे दोन कोटी रुपयांच्या योजनेचे उद्घाटन मराठी पूर्व माध्यमिक शाळा घारोडजवळ मोठ्या थाटामाटात करण्यात आले; पण कामाच्या संथगतीने व गावपातळीवरील राजकीय फायद्यामुळे योजना रखडली. पुन्हा नव्याने ही योजना राबविण्यात सुरुवात झाली. निरोड व घारोड मधोमध धरणांमध्ये विहीर खोदली; पण पाणी न लागल्याने पुन्हा दुसरीकडे घारोड भागात विहिरीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. पुन्हा अपयश आले त्या विहिरीला सुद्धा पाणी नाही लागले. त्यानंतर लाखनवाडा येथे रायधर धरणाच्या कुशीत तिसऱ्यांदा विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीला पाणी लागले. मात्र, अद्याप नागरिकांना पाणी मिळाले नाही.

आता शेतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना शेतातून १ किमीवरून पाणी आणावे लागत आहे. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना गावांमध्ये पाइपलाइन करण्यात आली. ही नवीन नळ योजना जुन्या योजनेशी जोडून सुरू करण्यात आली. मात्र, वाॅर्ड नं. २ मध्ये ५० टक्के नळाला पाणी येत नाही.ग्रामपंचायतच्या ठरावाला केराची टोपलीग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेतला होता. कोणीही नागरिक नळाला मोटर लावणार नाही; पण नागरिकांनी ग्रामपंचायतचा ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. सर्व नागरिक नळावर मोटर लावून पाणी भरत आहेत. परिणामी, ५० टक्के नागरिकांचा नळाला पाणी येत नाही. 

टॅग्स :Waterपाणी