शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

योजना दोन कोटींची; पण नळाला दोन थेंब पाणी येईना... 

By विवेक चांदुरकर | Updated: July 13, 2024 15:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कघारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपासून गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

घारोड येथे गेल्या २२ नोव्हेंबर रोजी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळयोजना व पाण्याची टाकी, असे दोन कोटी रुपयांच्या योजनेचे उद्घाटन मराठी पूर्व माध्यमिक शाळा घारोडजवळ मोठ्या थाटामाटात करण्यात आले; पण कामाच्या संथगतीने व गावपातळीवरील राजकीय फायद्यामुळे योजना रखडली. पुन्हा नव्याने ही योजना राबविण्यात सुरुवात झाली. निरोड व घारोड मधोमध धरणांमध्ये विहीर खोदली; पण पाणी न लागल्याने पुन्हा दुसरीकडे घारोड भागात विहिरीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. पुन्हा अपयश आले त्या विहिरीला सुद्धा पाणी नाही लागले. त्यानंतर लाखनवाडा येथे रायधर धरणाच्या कुशीत तिसऱ्यांदा विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीला पाणी लागले. मात्र, अद्याप नागरिकांना पाणी मिळाले नाही.

आता शेतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना शेतातून १ किमीवरून पाणी आणावे लागत आहे. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना गावांमध्ये पाइपलाइन करण्यात आली. ही नवीन नळ योजना जुन्या योजनेशी जोडून सुरू करण्यात आली. मात्र, वाॅर्ड नं. २ मध्ये ५० टक्के नळाला पाणी येत नाही.ग्रामपंचायतच्या ठरावाला केराची टोपलीग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेतला होता. कोणीही नागरिक नळाला मोटर लावणार नाही; पण नागरिकांनी ग्रामपंचायतचा ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. सर्व नागरिक नळावर मोटर लावून पाणी भरत आहेत. परिणामी, ५० टक्के नागरिकांचा नळाला पाणी येत नाही. 

टॅग्स :Waterपाणी