शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

वन्य प्राण्यांसाठी ज्ञानगंगा अभयारण्यात ‘साटण लोटण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 10:46 AM

Gyanganga Sanctuary पाणवठ्याच्या जवळ मीठ व माती कालवून साटण लोटण करण्यात येते.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : उन्हाळ्यात ज्ञानगंगा प्रकल्पातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येत असून, साटण लोटण करण्यात येत आहे. पाणवठ्याच्या जवळ मीठ व माती कालवून साटण लोटण करण्यात येते.  प्राण्यांचे पगमार्क ओळखण्यासाठी व उन्हाळ्यात थंडावा राहण्यासाठी साटण लोटण करण्यात येते.   बुलडाणा जिल्ह्यात २०५ चौरस किमी परिसरात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, नीलगाय, रानडुकर आदी प्राणी आढळतात. तसेच मोर, चिमणी, कावळा, पोपट, तितर, बटर यासह अनेक पक्षी आहेत. बुलडाणाखामगाव अशा दोन परिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य पसरले आहे. उन्हाळ्यात या अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठे सुकतात. त्यामुळे वनविभागाच्यावतीने  तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणी टाकण्यात येते. ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्यावतीने ८२ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचा कंत्राट देण्यात आला असून, नियमित पाणी टाकण्यात येत अ सल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच या सर्व पाणवठ्यांच्या बाजूला साटण व लोटण करण्यात येत आहे.  याबाबत माहिती देताना वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी सांगितले, की  पाणवठ्याच्या चहूबाजूने माती व मीठ कालवून ठेवण्यात येते. या ठिकाणी प्राणी लोळतात. त्यामुळे त्यांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळतो. तसेच पाणवठ्याच्या परिसरात रेती व माती टाकून ओली करण्यात येते. वन्यप्राण्यांचे पगमार्क यावर उमटत असून, कोणता प्राणी पाणी पिण्यासाठी आला होता, याची माहिती मिळते. त्यामुळे दरवर्षी पाणवठ्यांच्या बाजूला साटण लोटण करण्यात येत असल्याचे सुरवसे यांनी सांगितले.

ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकण्यात येत असून, साटण लोटण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. तसेच प्राण्यांना उन्हापासून दिलासा मिळावा व त्यांचे पगमार्क ओळखता यावे यासाठी साटण लोटण करण्यात येत आहे. - मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, बुलडाणा.  

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव