शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

सरपंच टँकरद्वारे भागवत आहेत ग्रामस्थांची तहान; अत्रंज येथे नि:शुल्क पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:34 PM

खामगाव :  तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.खामगाव तालुक्यातील अंत्रज हे सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. गावातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी सरपंच शिवराज महाले आणि मित्र मंडळाच्यावतीने स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १५ मार्चपासून गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लीटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. गावातील पाणी टंचाई निवारणार्थ, तसेच नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गत दोन महिन्यांपासून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत असल्याचे सरपंच शिवराज महाले यांनी सांगितले.

 भारनियमनामुळे पाणी समस्या!ग्रामीण भागात वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अंत्रज येथेही पाण्याचे नि:शुल्क वितरण करताना ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच शिवराज महाले मित्र मंडळाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई