काेराेना काळात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:34 IST2021-05-13T04:34:20+5:302021-05-13T04:34:20+5:30

उन्हाळ्याची काळजी नाही, पाण्या, पावसाची फिकीर नाही, गणपती असो की ईद, मोर्चा असो की निवडणुका, आता जिवाची बाजी लावून ...

The role of the police was important during the Kareena period | काेराेना काळात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

काेराेना काळात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

उन्हाळ्याची काळजी नाही, पाण्या, पावसाची फिकीर नाही, गणपती असो की ईद, मोर्चा असो की निवडणुका, आता जिवाची बाजी लावून कोरोनाच्या संसर्गातही बंदोबस्तात आपली सेवा देत आहेत. कोरोना संक्रमणाला आळा घालण्याच्या बंदोबस्तात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सामान्य नागरिक ते कर्तव्यदक्ष पोलीस, असे परिवर्तन खडतर प्रशिक्षणानंतर हाेते. सण, उत्सव निवडणुका सर्व बंदोबस्त यशस्वीरित्या राबविण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. आता एक वर्षापासून कोरोनाने त्यांचे कौटुंबिक जीवन हिसकावून घेतले आहे. आपला जीव धोक्यात टाकून खाकीतला माणूस गर्दी रोखणे, उगाचाच विनास्माक रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, त्यांना समज देणे आदी कामे करीत आहे. समाजासाठी १२-१२ तास अहोरात्र काम करीत आहे. आपल्यापासून चुकीने घरच्यांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक पोलिसांनी आपले कुटुंब गावाला पाठविले आहे. पोलिसांचे हे कर्तव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्त्वाचे ठरले आहे.

Web Title: The role of the police was important during the Kareena period