रिक्षाचालकांचे कधी राईट तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांचा वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:22+5:302021-09-23T04:39:22+5:30

बुलडाणा : बाहेरगावावरून शहरात प्रवेश करताना प्रथम प्रवाशांची भेट रिक्षाचालकांशी होते. प्रत्येक प्रवाशाला शहर अनोळखी असल्याने प्रवासी रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार ...

Rickshaw pullers sometimes right and sometimes left, annoying the passengers | रिक्षाचालकांचे कधी राईट तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांचा वैताग

रिक्षाचालकांचे कधी राईट तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांचा वैताग

बुलडाणा : बाहेरगावावरून शहरात प्रवेश करताना प्रथम प्रवाशांची भेट रिक्षाचालकांशी होते. प्रत्येक प्रवाशाला शहर अनोळखी असल्याने प्रवासी रिक्षाचालकाने सांगितल्यानुसार रिक्षाचे भाडे द्यायला तयार होतो. याचा फायदा घेत काही रिक्षाचालक अनाेळखी प्रवाशांकडून जादा दर आकारत असल्याचे चित्र आहे.

साधारणत: बसस्थानक, जांभरून राेड, जयस्तंभ चाैक, आठवडी बाजार, चिखली राेड या ठिकाणी रिक्षांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. यातील बसस्थानकाजवळ रिक्षाचालकांची अक्षरश: स्पर्धा असते. प्रवासी उतरला की त्याला हेरण्यासाठी रिक्षाचालक त्यांच्या मागे-पुढे येतात. यामुळे प्रवासीही भांबावून जातात. अनेकजण वाटेल तेवढे दर सांगतात, तर काहीजण वाजवी दर सांगतात. मात्र, वाजवी दर सांगणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. यातून प्रवासी मात्र नाडवला जात आहे.

बसस्थानक

शहरातील बसस्थानकाच्या परिसरात रिक्षाचालकांची गर्दी असते. बसमधून उतरलेला प्रवासी आपल्यालाच मिळावा, यासाठी अनेक वेळा रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा असते. याच ठिकाणी ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे ऑटाेही उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेताे.

भगवान महावीर चाैक

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या भगवान महावीर चाैकातही माेठ्या प्रमाणात ऑटाेचालक वाहतुकीस अडथळा करतात़ आठवडी बाजारादिवशी सर्वसामान्य नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे़

स्टेट बँक चाैक

शहरातील सर्वाधिक रहदारीचा असलेल्या स्टेट बँक चाैकातही ऑटाेचालकांची माेठी गर्दी असते़ त्यांच्यामध्ये प्रवासी घेण्यासाठी स्पर्धा असते. शासकीय कार्यालये असल्याने प्रवासी माेठ्या प्रमाणात असते़ याकडे पाेलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे़

मनमानी भाडे

शहरातील काही ऑटाेचालक मनमानी भाडे आकारत आहेत़ एरव्ही शहरात कुठल्याही भागात जाण्यासाठी प्रती प्रवासी ३० रुपये आकारण्यात येतात़

घरापर्यंत जायचे असल्याने ४० ते ६० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येते़

तसेच नवीन प्रवाशांना जादा भाडे सांगितले जाते़ शहरातील प्रवाशांना नियमित भाडे आकारले जाते़

प्रवाशांना त्रास

बसमधून उतरल्यानंतर अनेक वेळा गाेंधळ हाेताे़ कुठल्या रिक्षाचालकाला हाे म्हणायचे असा संभ्रम अनेक वेळा हाेताे़ रिक्षाचालक मनमानी दर आकारत असतात़

विजय क्षीरसागर, प्रवासी

बसस्थानक चाैकात एकाच वेळी अनेक ऑटाेचालक आवाज देत असल्याने नेमके कुणाकडे जावे, याविषयी संभ्रम हाेताे़ घरापर्यंत ऑटाे करायचा असल्यास चालक मनमानी दर आकारतात़

शरद तराळ, प्रवासी

ऑटाेवर करडी नजर

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांसह इतर वाहनचालकांवर वाहतूक शाखेची करडी नजर असते़ अनेक वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे़ यापुढेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटाेचालकांसह इतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल़

शांतिकुमार पाटील, प्रभारी निरीक्षक, वाहतूक शाखा, बुलडाणा

Web Title: Rickshaw pullers sometimes right and sometimes left, annoying the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.