शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

मराठा आरक्षणाचा विरोध आघाडीला भोवणार- मेटे

By admin | Updated: May 12, 2014 22:38 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामची उडी

खामगाव: राज्यात गेली साठ वर्ष मराठा नेत्यांनी राज्य केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदे उपभोगली. मात्र, मराठा समाजाच्या हिताचा कोणताही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणालाही विरोध केला, त्यामुळेच आपण महायुतीशी कास धरल्याचे शिवसंग्राम या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी येथे स्पष्ट केले. नांदुरा रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या तथाकथीत नेत्यांनी समाजहिताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाची अवस्था वाईट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मराठा आरक्षणाकडे कानाडोळा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असून ह्यराजकीय आत्महत्याह्ण टाळण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्यामाध्यमातून समाजाच्या विविध समस्या सोडविण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय दिल्यामुळेच समाज आपल्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणाच्या लढय़ात आपल्याला सर्वदूर पाठींबा मिळत आहे. समाजातील गरिबांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी ओबीसींमध्ये समावेश करून २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसंग्राम सातत्याने करीत आहे. मात्र, याकडे सत्ताधार्‍यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. युती शासनाच्या काळात निर्माण झालेल्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडे राजकीय विरोधातून आघाडी शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात या मंडळाला शासनाने कोणतीही मदत केली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जाती-धर्मापेक्षा न्याय देणारा महत्वाचा असतो. त्यामुळेच आता आपण आपली चूक सुधारली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला. परंतु, विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसंग्राम पक्ष रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही विधानसभेवर शिवसंग्रामचे उमेदवार उभे राहतील. मराठा आरक्षणाची चळवळ गतीमान करण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना एकत्र करून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संपर्क सुरू आहे. या पत्र परिषदेला अकोला जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, बुलडाणा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राजेंद्र मस्के, पवन शर्मा, रंगरावबापू देशमुख, सचिन देशमुख आदी उपस्थित होते. ** ..तर पहिल्याच अधिवेशनात समाजाला आरक्षण देवू गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात राज्य करणार्‍या आघाडी शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष चालविले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे जनता त्यांना आपली जागा दाखवून देणार असून राज्यात आघाडीचे पाणीपत होणार आहे. महायुतीचे उमेदवार तब्बल ३५ ठिकाणी विजयी होणार असल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. आघाडी शासनाने आरक्षण न दिल्यास महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.