शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 17:30 IST

आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागलेय; संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज बुलढाण्यात सभा सुरु आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, गद्दारीची बिजे जी रोवली गेलीत ती कायमची उखडून फेकण्याची जबाबदारी या मशालींवर, असे म्हटले आहे. 

सर्वात जास्त खोके बुलढाण्यात आलेत. आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? हा ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र, ज्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले, आणि हे मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेलेत, अशी टीका राऊतांनी केली. 

शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी मी १०० दिवस काय जन्मठेपेसाठी तयार आहे. राज्य कायद्याने नाही, बेकायद्याने चालले आहे. बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसविलेले आहे, ते जाणार. मी तुरुंगात जाताना हा भगवा माझ्यासोबत होता, अखेरच्या श्वासापर्यंत हा भगवा माझ्यासोबत राहिल असे म्हणालो होतो. आताही तो सोबत आहे. शिवसैनिक विकत घेता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.

या बुलढाणा जिल्ह्यात आलेले सगळे खोके आणि सरकार यांनी फक्त जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्राची बदनामी केली. महाराष्ट्राला इतिहास आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये, इतर राज्यांना भुगोल आहे. या जिल्ह्यात जिजामाता जन्माला आल्या, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. म्हणून पहिली सभा बुलढाण्यातून सुरु केली आहे, असा इतिहास राऊतांनी सांगितला. आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागले आहे. कारण हे नवस करून आणलेले लोक नाहीत, ते चटणी-भाकरी घेऊन आलेले लोक आहेत. शिवसेना आधीपेक्षा जोमाने पुढे जातेय. ही घोडदौड आता थांबता नये. तुम्ही चाळीस फोडले असाल पण विदर्भातले ४० लाख आमच्यासोबत आहेत. वतनदार फोडले असतील, पण हा मावळा आमच्यासोबत आहे, असे राऊत म्हणाले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना