प्रवेश कराच्या नावाखाली वसुली
By Admin | Updated: December 22, 2014 23:39 IST2014-12-22T23:39:25+5:302014-12-22T23:39:25+5:30
चिखली बाजार समितीचे उरफाटे वागणे; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात.

प्रवेश कराच्या नावाखाली वसुली
चिखली (बुलडाणा): शेतकर्यांनी आपला शेतमाल वाहून आणलेल्या वाहनांवर प्रवेश कर लादून दुष्काळात त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने चालविला आहे. याची तातडीने दखल घेवून शिवसेनेने या वसुलीविरोधात तीव्र नापसंत व्यक्त केली असून दुष्काळा त अशी वसुली करून तेरावा महिना शेतकर्यांवर लादणार्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
सबंध जिल्हाभरात एकाही बाजार समितीमध्ये प्रवेश फी घेतल्या जात नाही. कदाचित प्रवेश फी आकारण्याचा बाजार समितीचा अधिकारही असेल पण राज्यभरात दुष्काळ असताना व त्या दुष्काळाने शेतकरी होरपळून आत्महत्येसारखा घातक मार्ग पत्करत असताना शेतकरी हित जोपण्याची जबाबदारी असलेल्या बाजार समितीने असा रझाकारी निर्णय घेवून शेतकरी हिताच्या भूमिकेला हरताळ फासला आहे. आपल्या निर्णयाचे सर्मथन करताना बाजार समिती प्रशासन आपण ही प्रवेश फी शेतकर्यांकडून नव्हे तर वाहनधारकांकडून आकारत असल्याची मल्लीनाथी करताना आढळून येते. मात्र, वाहनधारक जर शेतकर्याचा माल घेवून आला असेल तर त्या मालाला आणताना लागलेल्या जकात व टोलनाक्यासार ख्या सर्व खर्चांची वसुली शेवटी शेतकर्यांच्याच खिशातून होते. अप्रत्यक्षपणे का होईना, या निर्णयाचा फटका हा शेतकरी वर्गालाच बसतो. गेल्या १५ डिसेंबर पासून शेतकर्यांच्या शेतमालाला वाहून आणणार्या वाहनांवर प्रवेश फी अकारून वसुली सुरू केली आहे. शेतकरी संघटीत नाहीत त्यामुळे बाजार समितीचे फावते आहे.