शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 4:33 PM

केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले.

बुलडाणा: केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून या विरोधात राज्य शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जोरदार हरकत नोंदवावी. हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना बाजारात मिळत आहे. त्याचा फरक थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.स्वाभीमानी शेतकरी संघटनेची पुनर्रचना आणि पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर, दामू अण्णा इंगोले, बबन चेके, घनश्याम चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर टाले, राणा चंदन, नंदीनी कल्याणकर उपस्थित होते. तूरीचा हमी भाव व बाजार भावात जवळपास १,५०० रुपयांचा फरक आहे. शेतकºयाला सरासरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने ही फरकाची रक्कम शेतकºयाच्या खात्यात जमा केली जावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. संघटनात्मक फेरबदलाचीही त्यांनी माहिती दिली. शिर्डी येथे २२ फेब्रुवारी रोजी संघटनेची बैठक होत असून त्यात राज्य कार्यकारीणी निवडण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. बैठकीत घाटावरील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. ज्ञानेश्वर टाले तर स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव चेके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख रफीक शे. करीम, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवनकुमार यांची निवड करण्यात आली. घाटाखालील संघटना अध्यक्ष म्हणून श्याम अवथळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून अनंता मानकर यांची निवड करण्यात आली. तर भगवान मोरे यांची राज्य कार्यकारीणीवर वर्णी लागणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीbuldhanaबुलडाणा