शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

पावसाची दडी; बोगस बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 11:16 IST

कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांनी शेतामध्ये विविध पिकांच्या बियाण्यांची पेरणी केली. त्यांपैकी अनेकांचे बियाणे उगवलेच नाहीत. विविध कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे. परिणामी बियाणे न उगवण्याचे दुसरे कारण समोर आल्यामुळे पावसाची दडी बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे.सध्या बहुतांश तालुक्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. मात्र, बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी कृषि विभागाकडे येत आहेत. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. पावसाने दडी दिल्यामुळे सुद्धा बियाणे उगवत नाहीत. सध्या शेतात असलेल्या बियाण्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता कमी आहे. बियाणे बोगस असल्यामुळे उगवले नाहीत की पावसामुळे असा संभ्रम कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. बियाण्यांची उगवणक्षमता ६५ टक्के असणे आवश्यक असते. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत अनेक कंपन्या बोगस बियाणे बनवितात. यावर्षी सुद्धा अशा कंपन्यांनी बियाण्यांची विक्री करण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे कृषि विभागाने शेतकºयांना घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाच्या काळात सभा व कार्यक्रम घेणे शक्य नसल्यामुळे वाहनांवर लाऊडस्पीकर लावून उगवण क्षमता कशी तपासावी, याबाबत मार्गदर्शन केले होते. कृषि विभागाच्या आवाहनानुसार शेतकºयांनी घरगुती बियाण्यांची पेरणी केली. मात्र, उगवण क्षमता तपासण्यात घोळ झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे घरगुती बियाणेही उगवले नाहीत.बियाण्यांचा नमुना ठेवणे आवश्यकबियाणे विकत आणल्यावर पेरणी करीत असताना बियाण्यांचे काही नमुने ठेवणे आवश्यक आहे. सोयाबिनचे बियाणे कमीतकमी २५० ग्रॅम पेरणी न करता ठेवायला हवे. अन्य पिकांचे त्यापेक्षा कमी ठेवावे. पेरणी केल्यानंतर या नमुन्यांची तपासणी करून बियाणे योग्य आहे की नाही, याचा शोध घेणे शक्य होते.

गतवर्षी सोयाबिन सोंगणीच्यावेळी पाऊस आला होता. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सोयाबिन बियाण्यांमध्ये दोष आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकºयांनी घरच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करायला हवी. विकतचे बियाणे घेताना सुद्धा ते शासनमान्य आहेत की नाही, बियाण्यांची उगवणक्षमता ७० टक्के आहे की नाही? हे तपासावे.- डॉ. आम्रपाली आखरे, संशोधक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेती