शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पावसाचा कपाशीला फटका! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:39 AM

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. 

ठळक मुद्देभावात होणार घसरणसोयाबीन, कपाशीचे नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी, नाले वाहू लागले असून, काही तलाव भरले आहेत. याशिवाय शेतात पाणी साचले असून, सोयाबीन सोंगणीसह शेतातील विविध कामे ठप्प पडली आहेत. अवकाळी पावसापूर्वी काही दिवस कडक उन्हाने हजेरी लावल्यामुळे कपाशी पिकाला फायदा झाला होता. अनेक परिसरात पक्क्या झालेल्या कापसाच्या बोंडातून कापूस बाहेर पडला होता. दिवाळीपूर्वी कापसाची पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस शेतकर्‍यांच्या घरात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तीन दिवसांपासून येणार्‍या पावसामुळे कापूस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडाबाहेर पडलेल्या कापसावर पाणी पडल्यानंतर पांढरा दिसणारा कापूस काळवंडला असून, त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे  या पांढर्‍या सोन्याला मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सोयाबीन पिकापेक्षा जास्त २ लाख ५९ हजार ३४६ हेक्टर आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकर्‍यांचा कापूस पिकाकडे कल वाढला होता. यावर्षी सोयाबीनपेक्षा कापूस पीक चांगले येईल, असा अंदाज व्यक्त होत असताना अवकाळी पावसाने चांगलाच फटका दिला आहे.     दरवर्षीप्रमाणे यावर्षी कापूस पिकांची पहिली वेचणी होऊन कापूस घरात येईल, अशी अपेक्षा असताना सोयाबीन सोंगणीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकर्‍यांना फटका दिला आहे. शेतात काही शेतकर्‍यांची सोयाबीन सोंगणी सुरू असताना उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाला पावसाने फटका दिला आहे. येणार्‍या काही दिवसात पाऊस न थांबल्यास शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.    

सोयाबीन, कपाशी, मका पिकांना फटका धामणगाव बढे: गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन शेतात भिजत असून, शेकडो हेक्टरवरील कापूस व मक्याचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सुरुवातीला अल्पसा पाऊस पडला. त्यामुळे उत्पन्नामध्ये अगोदरच घट झाली. त्यानंतर परतीच्या पावसाने उद्ध्वस्त होत आहे. मागील चार दिवसांपासून धा.बढे, किन्होळा, सिंदखेड, पिंपळगावदेवी, पिंप्रीगवळी, पोफळी, ब्राम्हंदा, रोहिणखेड परिसरात दररोज मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात सोयाबीन, मका शेतात कापून ठेवले आहे. सततच्या पावसाने ही पिके सडत आहेत, तर त्यांना कोंब येत आहेत. सततच्या पावसामुळे कामे बंद आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. सुरुवातीचा अत्यल्प पाऊस, घटलेले उत्पन्न, मालाचे पडलेले भाव, वाढता खर्च व त्यात परतीच्या पावसाने होणारे नुकसान यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

धाड परिसरात पिके गेली वाहूनधाड : मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घालत, शेतकर्‍यांची पुरती दैना केली आहे. बुधवारी दुपारी जोरदार पावसानंतर आलेल्या  पुरामुळे परिसरातील शेतांमधील मक्याचे पीक व कृषी साहित्य वाहून गेले. गत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात नदीनाल्यांना पूर आले आहेत. जोरदार पावसाने बाणगंगा नदीस मोठा पूर आला. या पुराचे पाणी नदीलगत असणार्‍या धाड येथील शेतकरी गणेश बंडू गायकवाड यांच्या शेतात शिरले व संपूर्ण शेतातील पीक वाहून गेले.  गणेश गायकवाड यांनी  तीन एकरावर मका पिकाची लागवड केली होती. ती सोंगणी करून चारा व कणसे शेतात पडून होती. पुराच्या पाण्याचा वेग आणि व्याप्ती मोठीच असल्याने काही वेळातच तीन एकरावरील संपूर्ण मका पीक चार्‍यासह वाहून गेले. शेतात सोंगणी केलेला तब्बल एक लाखाच्या शेतमालाचे पुरामुळे नुकसान झाले., तसेच येथे त्यांचे स्प्रिंकलरचे १६ पाइप, एक मोटरपंप असे कृषी साहित्य पुराचे पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.