शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दारूबंदीसाठी राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:37 IST

चिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उतरल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देदारूबंदीसाठीची मतदान प्रक्रि येतील बदलासाठी विंगमध्ये उतरले

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कोणत्याही गावात दारूबंदी लागू करण्यासाठी पार पडणाºया मतदान प्रक्रियेत बदल करण्यात येऊन ही मतदान प्रक्रिया महसूल विभागामार्फत घेण्यात यावी, मागणीसाठी विधानसभेत आमदार राहुल बोंद्रें यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांसमोरील विंगमध्ये उतरल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.विधानसभेच्या कामकाजादरम्यान दारूबंदीबाबत आमदार डॉ.अनिल बोडे यांनी लक्षवेधी दाखल केली होती़  या चर्चेत सहभागी होताना देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी गावातील एकंदरीत महिलांचे ५० टक्के मतदान दारूबंदीच्या बाजूने व्हावे लागते़  तरच दारू दुकान हटविण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र ही अटच मुळात लोकशाहीविरोधी असून, दारूबंदीसाठी झगडणाºया महिलांची गळचेपी करणारी आहे़  तसेच दारूचे दुकान हटविण्यासाठी होणारी मतदान प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून होते. त्यांच्याकडून ही प्रक्रिया काढून घेत ती महसूल विभागावर सोपविण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज सभागृहात आक्रमकपणे लावून धरली़  दरम्यान, दारूच्या दुकानासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे रद्द करावे व इतर मागण्यांबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आ.बोंद्रे अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन तेथे त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.़ त्यामुळे येत्या तीन महिन्यांत सदर निर्णय बदलण्यासंदर्भात घोषणा करण्याचे आश्वासन ना. बावनकुळे यांनी दिले आहे. 

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करा!तालुक्यातील इसरूळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व त्यांचे श्रद्धास्थान असलेले भांगिर बाबाचे मंदिर हटविण्याच्या कार्यवाहीची न्यायालयीन चौकशी व्हावी व या प्रकरणात दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येऊन पुतळा त्याच जागेवर बसविण्यात यावा, अशी मागणी आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे़ 

शहर पाणी पुरवठा योजनेबाबत लवकरच बैठक चिखली शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही भूमिका विधानसभेत आ. राहुल बोंदे्र यांनी मांडली असता पाणी पुरवठा राज्यमंत्री ना. रणजित पाटील यांनी तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे सभागृहात जाहीर केले आहे. 

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेChikhliचिखली