शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

टंचाई निवारणाची दहा लाख रुपयापर्यंतची कामे ग्रामपंचायतींना देण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:06 IST

या कामांना गती  देता येईल असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव तथा बुलडाण्याचे पालक सचिव श्यामलाल गोयल यांना देण्यात आला आहे.

बुलडाणा : तीन लाखांपेक्षा अधिक खर्च मर्यादेची पाणीटंचाई निवारणाच्या कामासाठी कराव्या लागणाºया ई-निविदेमुळे मोठ्या प्रमाणावर कालापव्य होऊन टंचाईची कामे प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे तात्पुरती पुरक नळ योजना व तत्सम दहा लाख रुपयापर्यंतची टंचाईची कामे थेट ग्रामपंचायतींमार्फत केल्यास  कालापव्य टळून या कामांना गती  देता येईल असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव तथा बुलडाण्याचे पालक सचिव श्यामलाल गोयल यांना देण्यात आला आहे.दरम्यान, त्या संदर्भाने सकारात्मक भूमिका गोयल यांनी घेतली असून शासन निर्णय काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. २० मे रोजी बुलडाण्यात पाणीटंचाई आढावा बैठकीदरम्यान त्यांनी हे संकेत दिले.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे यांनी   आढावा बैठकीत याबाबत मुद्देसुद माहिती त्यांना दिल्यानंतर गोयल यांनी हे संकेत दिले आहेत. तीन लाख खर्च मर्यादेत टंचाईची कामे करताना अडचण नाही. परंतू तात्पुरती नळ योजना, पुरक नळ योजनांना लागणारा खर्च हा त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्याची ई-निविदा काढता आधी जि. प.च्या कॅफोकडून मंजुरात घ्यावी लागते. ई-टेंडर काढतांना सात दिवसांची मुदत असते. प्रतिसाद न मिळल्यास नंतर पाच व पुन्हा तीन दिवस जातात. एकुण प्रक्रियेस तब्बल २५ दिवसांचा कालावधी लागतो. हीच प्रक्रिया जर थेट ग्रामपंचायतीला दहा लाखापर्र्यंतची कामे करण्यास दिल्यास बीओकडून हा प्रस्ताव थेट कॅफोकडे जाऊन अवघ्या पाच दिवसात टंचाई निवारणाची अशी कामे मार्गी लागू शकतात, असा या अधिकाºयाचा होरा आहे. त्यास अवर सचिव गोयल यांनीही प्रतिसाद दिला. बी-वन  करारनामा ग्रामपंचायतींशी करून अशी कामे दिल्या जाऊ शकतात. ५० हजार रुपयांवरील कामांसाठी प्रामुख्याने ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीने टंचाई निवारणाची कामे दिल्यास सध्या पद्धतीनुसार जे काम किमान २५ दिवसात होते ते अवघ्या ५ दिवसात होईल असा यंत्रणेचा दावा आहे.दुष्काळी स्थिती  जिल्ह्यात टंचाई निवारणाची कामे विलंबाने होत असल्याने त्यांना गती देण्यासाठी आता या प्रस्तावावर काय भूमिका घेतल्या जाते याकडे  दुष्काळ ग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार