शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विवेकाधिष्ठित विद्वत्तेमुळे विकासाला चालना - ज्ञानेश्‍वर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:08 IST

विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला  चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी येथे केले.

ठळक मुद्देपाचवे विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विवेकाधिष्ठित विद्वत्ता ही सृजनात्मक विकासाला  चालना देण्यासाठी कारणीभूत ठरते. तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्यातून स्पष्ट होते. ग्रामगीता हे त्याचेच सार आहे, असे प्रतिपादन वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी येथे केले.बुलडाणा येथील स्व. पंकज लद्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट स्टडीज तथा भारतीय विचार मंचच्या विदर्भ शाखेच्यावतीने बुलडाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्वान हे संत असतात; परंतु सर्वच विद्वान हे संत असू शकत नाहीत. संतांनी देव व माणसांना जागविण्याचे काम केले आहे. संत वाड्मय अजिर्त नसून प्रासादिक आहे. शस्त्रक्रियेशिवाय हृदय परिवर्तन करण्याची शक्ती त्यात आहे. संत वाड्मय मनोरंजन नव्हे, तर मनोमंथनासाठी आहे, अशी भावनाही  ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटन रविवारी २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. प्रारंभी सकाळी ८.३0 वाजता ग्रंथदिंडीची परिसरातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, साहित्य संमेलनाचे संयोजक डॉ.दीपक लद्दड, रवींद्र लद्दड, प्राचार्य प्रदीप जावंधिया, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, नगरसंघचालक बाळासाहेब देशपांडे, नगर सहसंघचालक प्रा.विजयराव जोशी, प्राचार्य शांताराम बोटे, डॉ. विकास बाहेकर, प्रा. मोरेश्‍वर देशमुख, विहिंप विदर्भ संघटक मंत्री अरुण नेटके, आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रवीण चिंचोळकर, गिरीश दुबे उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमध्ये ज्ञानदेवांची प्रतिभा, नामेदवांचा प्रचार, नाथंची प्रपंच, तुकोबारायांचा प्रतिकार असे सर्व गुण होते. माणूस जोडण्याचे व घडविण्याचे मानवतेचे काम राष्ट्रसंतांनी केले आहे, असे ज्ञानेश्‍वर महाराज वाघ शेवटी म्हणाले. सोबतच ग्रामगीता ही तुकडोजी महाराजांच्या मातृहृदयाला सुटलेला पान्हा आहे. प्रबोधनासह परिवर्तनाची ताकद त्यामध्ये आहे.गुरुकुंज मोझरीचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांचेही यावेळी  भाषण झाले. आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी राष्ट्रसंतांचे साहित्य संमेलन म्हणजे एकाच संताचे विचारांचे साहित्य संमेलन आहे. सर्व संतांचे विचार यात असतात, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा.सुभाष लोहे यांनी केले. डॉ. दीपक लद्दड यांनी राष्ट्रसंताचे विचार समाज प्रबोधन तरुण पिढीवर संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने आमच्या संस्थेला विदर्भस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन अर्चना देव यांनी केले. 

आजच्या शिक्षणाचा पाया राष्ट्रसंतांनी रचला उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ. राजेश जयपूरकर यांनी आजच्या आधुनिक शिक्षणाचा पाया राष्ट्रसंतांनी रचला. संत साहित्य आत्मशक्ती वाढविणारे असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाचा व कुटुंबांचा सार ग्रामगीतेत मांडला आहे. ही ग्रामगीता प्रत्येकाने वाचली पाहिजे. व्यक्ती विकासाच्या तथा जीवनाच्या प्रत्येक पैलूचा ग्रामगीतेच्या माध्यमातून अभ्यास करता येतो. त्यामध्ये या सर्व बाबींवर चिंतन झाले आहे, असे ते म्हणाले. सोबतच संत साहित्य अभ्यासक्रमात असले पाहिजे. त्यातून बालमनावर चांगले संस्कार रुजविल्या जातात, असे ते म्हणाले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी