शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आठ प्रकल्पांमधील निधीचा ‘खोडा’ दूर, १,२४६ कोटींचे प्रकल्प मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:58 IST

बळीराजा जल संजीवनी योजनेतंर्गत केंद्र सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी भरीव निधीची दोन

नीलेश जोशीबुलडाणा : बळीराजा जल संजीवनी योजनेतंर्गत केंद्र सरकारने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी भरीव निधीची दोन दिवसापूर्वीच तरतूद केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २४६ कोटी रुपये किंमत असलेल्या आठ प्रकल्पांची कामे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. निधीच्या अडचणीमुळे हे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास निर्माण झालेली मोठी अडचण पाहता जिल्ह्याच्यादृष्टीने हा मोठा दिलासा आहे.मे २०१९ पर्यंत हे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्यातील सिंचन क्षमतेमध्ये ४६ हजार ७३५ हेक्टरने वाढ होण्यास मदत होईल. दरम्यान, दोन हजार हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पांचा यात समावेश असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत अंबाबरावा अभयारण्याच्या दहा किमी अंतराच्या पट्ट्यातील अर-कचेरी, आलेवाडी या प्रकल्पांचीही समस्या त्यामुळे निकाली निघाली आहे. बळीराजा जल संजिवनी योजनेतंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील एक मोठा, एक मध्यम आणि आठ लघू प्रकल्पांचा तसा समावेश आहे.यात मोठ्या प्रकल्पांमध्ये जीगव, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा(३६४.३६ कोटी रुपये) (पालक अभियंता म्हणून बुलडाणा जिल्ह्यात आहे.), निम्न ज्ञानगंगा (१५९.५५ कोटी), आलेवाडी (१८८.५२ कोटी), अर-कचेरी (२३१.४७ कोटी), चौंढी (१९०.०१ कोटी), द्रुगबोरी (२२.४१ कोटी), बोरखेडी (४५.५७ कोटी), दिग्रस (६.६० कोटी (कोल्हापुरी बंधारा)) आणि राहेरा (३८.२८ कोटी) या प्रकल्पांचा समावेश आहे. पैकी जिगाव प्रकल्पाची सुमारे साडेसहा हजार कोटीवरून १२ हजार ६६२ कोटी रुपये किंमत झाली आहे.

सप्टेंबर २०१४ मधील अहवालाच्या पृष्ठभूमीवर राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमातंर्गत जिगाव, निम्न ज्ञानगंगा, द्रुगबोरी या प्रकल्पांचा आधीच समावेश असून बळीराजा जल संजिवनी योजनेतंर्गत त्यांचा समावेश झाल्याने या प्रकल्पांच्या कामाला अधिक वेग येणार आहे. निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत बुलडाणा-खामगाव मार्गावरील उंच तलांकीय पुलाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामातील महत्त्वाची अडचण दूर झाली असून ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या दहा किलोमीटर परिसरात हा प्रकल्प येत असल्याने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या मान्यतेसाठीही दोन वर्षापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

नव्या भुसंपादन कायद्यामुळे किंमतीत वाढनवीन भुसंपादन कायद्यातंर्गत भूसंपादन केलेल्या जमीनीचा पाचपट मोबदला देण्याची तरतूद असल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांच्या सुप्रमांनाही (सुधारीत प्रशासकीय मान्यता) मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच जिगाव प्रकल्पाचीही किंमत आज रोजी साडेबारा हजार कोटींच्या घरात गेली आहे. अर-कचेरी आणि आलेवाडी हे प्रकल्प २०१५ दरम्यान ७७ कोटींच्या घरात होते ते आज अनुक्रमे २३१.४७ कोटी आणि १८८.५२ कोटी रुपयांवर गेले आहेत. चौंढी प्रकल्पाच्याकिंमतीमध्येही वाढ झाली आहे.