शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:41 IST

मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी किती बळी घेणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे

ठळक मुद्देदर पंधरा मिनिटाला चक्का जाम : अपघातातही झालीय वाढ!

हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी किती बळी घेणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. धुळे ते अमरावतीदरम्यान सुरुवात झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची प्रक्रिया आता मलकापूर ते अकोलादरम्यान सद्यास्थितीत सुरू आहे. भूसंपादनानंतर प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा लाभ देताना वेगवेगळ्या मुद्यांवरून महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया वारंवार चर्चेत राहिली आहे. त्यासाठी रस्त्यालगतच्या कापण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरण संतुलनाचा प्रश्नही ऐरणीवर झाला.मागील दहा ते बारा वर्षात आता कुठे महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती आहे; मात्र त्यातही रस्त्याच काम निश्‍चित कालवधीत होईल किंवा नाही,  असा प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे महामार्गाची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे रस्त्यात खड्डे की खड्डय़ात, रस्ता अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्डेच खड्डे रस्त्यावर पडल्याने महामार्गावर मलकापूर ते नांदुरादरम्यान मौजे वाघुड, बेलाड, वडनेर भोलजी आदीसह विविध ठिकाणी दर पंधरा मिनिटाला चक्का जाम होत आहे. परिणामी सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था असंख्य लहान-मोठय़ा वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पर्यायाने रस्त्यालगत वसलेल्या गावांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. महामार्गावर मोठय़ा जड वाहनांच्या दिमतीला लहान वाहनांची प्रामुख्याने मोटारसायकलींची ही भाऊगर्दी असते. त्यामुळे चिकार वाहतुकीचा रस्ता अशी महामार्गाची ओळख आहे. अशात खड्डा चुकवण्याचा प्रयत्न वाहनधारकांचा असतो. त्यामुळेच असंख्य अपघात मलकापूर व नांदुरादरम्यान झाल्याची नोंद पोलिसात आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून, जखमींची संख्या तर लक्षवेधी ठरावी अशीच आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संवाद साधला असता, चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. मलकापूर ते नांदुरादरम्यान प्रत्यक्ष पाहणीत तसे दिसत नाही. उलटपक्षी अपघातात वाढच होत चालली, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी प्रशासन किती बळी घेणार, हा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा !महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थंड बस्त्यात आहे. परिणामी वाहनधारकांची डोकेदुखी वाढलीय. वाढत्या अपघातात अनेक जीव गेल्याने महामार्ग कर्दनकाळ ठरू पाहत असल्याने लोकप्रतिनिधींनी या विषयावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, असा सूर उमटत आहे.

चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. येत्या मार्च अखेरीस बर्‍यापैकी काम पूर्ण झालेले असेल. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. त्यात यश येईल, असा विश्‍वास आहे.-व्ही.पी. ब्राह्मणकरप्रकल्प अधिकरी, राष्ट्रीय महामार्ग ६ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्ग