शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:41 IST

मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी किती बळी घेणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे

ठळक मुद्देदर पंधरा मिनिटाला चक्का जाम : अपघातातही झालीय वाढ!

हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी किती बळी घेणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. धुळे ते अमरावतीदरम्यान सुरुवात झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची प्रक्रिया आता मलकापूर ते अकोलादरम्यान सद्यास्थितीत सुरू आहे. भूसंपादनानंतर प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा लाभ देताना वेगवेगळ्या मुद्यांवरून महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया वारंवार चर्चेत राहिली आहे. त्यासाठी रस्त्यालगतच्या कापण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरण संतुलनाचा प्रश्नही ऐरणीवर झाला.मागील दहा ते बारा वर्षात आता कुठे महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती आहे; मात्र त्यातही रस्त्याच काम निश्‍चित कालवधीत होईल किंवा नाही,  असा प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे महामार्गाची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे रस्त्यात खड्डे की खड्डय़ात, रस्ता अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्डेच खड्डे रस्त्यावर पडल्याने महामार्गावर मलकापूर ते नांदुरादरम्यान मौजे वाघुड, बेलाड, वडनेर भोलजी आदीसह विविध ठिकाणी दर पंधरा मिनिटाला चक्का जाम होत आहे. परिणामी सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था असंख्य लहान-मोठय़ा वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पर्यायाने रस्त्यालगत वसलेल्या गावांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. महामार्गावर मोठय़ा जड वाहनांच्या दिमतीला लहान वाहनांची प्रामुख्याने मोटारसायकलींची ही भाऊगर्दी असते. त्यामुळे चिकार वाहतुकीचा रस्ता अशी महामार्गाची ओळख आहे. अशात खड्डा चुकवण्याचा प्रयत्न वाहनधारकांचा असतो. त्यामुळेच असंख्य अपघात मलकापूर व नांदुरादरम्यान झाल्याची नोंद पोलिसात आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून, जखमींची संख्या तर लक्षवेधी ठरावी अशीच आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संवाद साधला असता, चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. मलकापूर ते नांदुरादरम्यान प्रत्यक्ष पाहणीत तसे दिसत नाही. उलटपक्षी अपघातात वाढच होत चालली, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी प्रशासन किती बळी घेणार, हा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा !महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थंड बस्त्यात आहे. परिणामी वाहनधारकांची डोकेदुखी वाढलीय. वाढत्या अपघातात अनेक जीव गेल्याने महामार्ग कर्दनकाळ ठरू पाहत असल्याने लोकप्रतिनिधींनी या विषयावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, असा सूर उमटत आहे.

चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. येत्या मार्च अखेरीस बर्‍यापैकी काम पूर्ण झालेले असेल. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. त्यात यश येईल, असा विश्‍वास आहे.-व्ही.पी. ब्राह्मणकरप्रकल्प अधिकरी, राष्ट्रीय महामार्ग ६ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्ग