शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

प्रधानमंत्री पिक विमा योजना ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:54 IST

एकीकडे अद्याप पेरण्याच सुरू झालेल्या नाहीत आणि दुसरीकडे विमा भरण्याची २४ जुलैची दिलेली मुदत, यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरण्याचीच चिन्हे आहेत.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आॅनलाईन विमा काढण्याची मुदत २४ जुलैपर्यंत ठरवून देण्यात आलेली आहे. परंतु दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा पाहता, पेरण्यांना उशीर होत आहे. सध्या विम्याची साईट सुरू असली, तरी शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होताना दिसत नाही.गतवर्षीचा अनुभव पाहता, तब्बल १८ ते २० जुलैपर्यंत पेरण्या सुरू होत्या. यावर्षी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे पेरण्यांना गतवर्षी प्रमाणेच उशीर होऊ शकतो. एकीकडे अद्याप पेरण्याच सुरू झालेल्या नाहीत आणि दुसरीकडे विमा भरण्याची २४ जुलैची दिलेली मुदत, यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरण्याचीच चिन्हे आहेत.यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यास सुरूवात झाली आहे. पिक काढण्याची मुदत २४ जुलै पर्यंत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षीही पावसाळा उशीरा सुरू झाल्याने तब्बल १८ ते २० जुलै पर्यंत पेरण्या सुरू होत्या. त्यामुळे अनेक शेतकºयांना पिक विमा काढणे शक्य झाले नाही. नंतर काही दिवसांसाठी मुदत वाढविण्यात आली होती. परंतु साईट बंद राहत असल्याने त्याचाही फारसा फायदा झाला नाही. यावर्षी सध्या पिक विमा काढण्याकरीता साईट सुरू आहे. परंतु त्याचा सध्या काहीही लाभ शेतकºयांना होताना दिसत नाही. यावर्षी अद्यापपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही.त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यावर्षी पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे. पेरण्या आटोपल्यानंतर सर्वच शेतकरी पिक विमा काढण्यासाठी गर्दी करणार आहेत. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात पिक विमा भरण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होऊन शेतकºयांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे पिकाला संरक्षण देण्यासाठी असलेली प्रधानमंत्री पिकविमा योजना शेतकºयांसाठी मृगजळ ठरण्याची चिन्हे आहेत.उशीरा होणाºया पेरण्या लक्षात घेता, त्यानुसारच पिक विमा काढण्याची मुदत ठरवून द्यावी व नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.मुदतवाढीनंतर राज्यावर बोजा!प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केंद्राने ठरवून दिलेल्या मुदतीच विमा काढणे बंधनकारक राहते. राज्य शासन त्यांच्या पातळीवर मुदत वाढवून देतेही; परंतु मुदतवाढीच्या काळात काढण्यात आलेल्या विम्याचे पैसे देण्यास केंद्राकडून नकार देण्यात येतो. त्यानंतर राज्य सरकारला विशेष तरतूद करून मुदतवाढीच्या काळात पिकविमा काढलेल्या शेतकºयांना विम्याची रक्कम द्यावी लागते. यामुळे शेतकºयांना पिकविम्याची रक्कम मिळण्यास विलंब होतो, असा शेतकºयांचा अनुभव आहे.गतवर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्याने पेरण्या उशीरा झाल्या. यानंतर पिकविमा काढण्यासाठी एकच गर्दी झाली. यात वेबसाईटही बंद राहत असल्याने पिकविमा काढण्यात अडचणी निर्माण झाल्या.- नंदकिशोर देशमुखशेतकरी, एकलारा बानोदा ता.संग्रामपूर.यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढणे सुरू झाले आहे. २४ जुलै ही मुदत ठरवून देण्यात आली आहे. शेतकºयांनी शक्यतो मुदतीच्या आत पिक विमा काढावा.- नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा