शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जीवीत हानी टाळण्यासाठी वीज 'अरेस्टर' बसवावेत - बुधवत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व ...

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलिकडील काळात लक्षणीय वाढले आहे.ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास आराखड्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केली आहे. मागणी ठरावरुपाने शासनाकडे करावी, जेणे करून जिल्हाभरात या प्रक्रियेला गती येईल असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज अरेस्टर बसविण्यात येऊन त्यासाठी जिल्हा नियोजन व विकास आराखड्यात विशेष तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याशी त्यांनी चर्चा ही केली आहे. अवकाळी पाऊस आणि वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अलिकडील काळात लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे वीज रोधक यंत्र बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनातंर्गतचा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे बनला असल्याचे जालिंधर बुधवत यावेळी चर्चेत बोलताना म्हणाले. मध्यंतरी वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. ग्रामीणसोबतच शहरी भागातही हे प्रमाण आता वाढले आहे. डीपीसी आराखड्यातंर्गत ग्रामपंचायतींसाठीही त्यानुषंगाने तरतूद केली जावी, अशी बुधवत यांची मागणी आहे. या चर्चेदरम्यान उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड, किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, आशिष जाधव, समाधान बुधवत, सुधाकर मुंढे, सचिन परांडे, किरण देशपांडे, बाळु धुड, उत्कर्ष डाफणे, शाम पवार, संजय ठाकरे, हरी सिनकर, नाना दांडगे, कुणाल गायकवाड, गिरीश आडेकर, गजानन भिंगारे उपस्थित होते.

ग्रामपंचायतने ठराव घेवून मागणी करावी

गावातील सभागृह, रस्ते, नाल्या यासाठी प्राधान्याने गावकरी मागणी करतात. परंतु जीवन-मरणाशी निगडित या प्रश्नावर काहीही होत नाही. वैज्ञानिक दृष्टीने हिताचा आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विज रोधक लावल्या जावू शकतात. याची तांत्रिक दृष्ट्या माहिती गावकऱ्यांनी घ्यावी. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीने विज रोधक बसविण्याची मागणी ठरावरुपाने शासनाकडे करावी, जेणे करून जिल्हाभरात या प्रक्रियेला गती येईल असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv SenaशिवसेनाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय