शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

मेहकरात पावसासाठी वरुणराजाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 15:01 IST

येथील तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ यांनी सपत्नीक वरुणराजाला आगमनासाठी पूजा करून साकडे घातले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मागील वर्षी जून महिन्यातील तालुक्यातील पावसाची एकूण नोंद बघता यावर्षीची परिस्थिती चिंताजनक आहे. २० जून पर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, येथील तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ यांनी सपत्नीक वरुणराजाला आगमनासाठी पूजा करून साकडे घातले आहे.गतवर्षी खरीप हंगामा सोबतच रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांचा संकटात गेला . पावसाच्या अल्प प्रमाणामुळे मेहकर तालुक्यातील दहा मंडळांमध्ये शासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. तालुक्यातील पेनटाकळी, कोराडी प्रकल्पासह इतर लहान जलाशयातील पाणी उपसा बंद केल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शेती सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे रब्बी हंगाम नुकसानीत गेला. यासोबतच बाजार भाव कोसळल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. या वर्षीची परिस्थिती त्याहूनही भीषण दिसत आहे. गतवर्षी दहा महसूल मंडळात एक ते २० जून पर्यंत पाऊस पडल्यामुळे शेतीची कामे सुरळीत सुरू झाली होती. परंतू यावर्षी अद्याप पावसाची नोंद न झाल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकºयांचे शेतातील पूर्वमशागतीची कामे तालुक्यातील बºयाच ठिकाणी खोळंबले आहेत. बºयाच शेतकºयांनी पूर्वमशागतीची कामे केली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात ही कामे झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाऊस लाबंल्यामुळे पेरणी चे नियोजन कोलमडले असून यावर्षी सोयाबीन, तूर व हायब्रीड या पिकाचा पेरा होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले असून खाजगी टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पावसाचे अजून आगमन न झाल्यामुळे यावर्षी शेतकºयांसह सर्वांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.तालुक्यात ठिकठिकाणी वरुणराजाला साकडे घालण्यात येत आहेत. यामध्ये मेहकर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष सिताराम ठोकळ महाराज यांच्यासह गोपाल पितळे, डॉ. शेषराव बदर, नारायण नागोलकर यांनी वरून गाजला साकडे घातले आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :MehkarमेहकरbuldhanaबुलडाणाRainपाऊस