शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
2
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
3
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
4
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
5
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
6
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
7
७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा
8
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
9
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
10
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
11
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
12
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
13
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
14
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
15
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
16
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
17
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
18
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
19
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
20
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:34 PM

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील उमेदवार इतर जिल्ह्यांसाठी अर्ज करत आहेत. वनरक्षक पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही अंतीम मुदत असल्याने अर्जासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी उरला आहे. वने हे नैसर्गिक स्त्रोतांचा एक अविभाज्य भाग सजमला जातो. या नैसर्गिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ‘वनरक्षकाच्या’ खांद्यावर असते. त्यामुळे वन विभागात वनरक्षक (गट क) या पदाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. राज्यात वन विभागातील गट क संवर्गातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदे भरण्यात येत असून त्यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ व अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागांचा समावेश आहे. परंतू या पदभरतीमध्ये पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला या तिन्ही जिल्ह्याच्या वाट्याला एकही जागा आली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया सुरू असताना पश्चिम वºहाडातील जिल्हे यामध्ये वगळण्यात आल्याने या जिल्ह्यातील उमेदवारांना इतर ठिकाणी अर्ज करावे लागत आहेत. परिणामी बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेसाठी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुरूवात १४ जानेवारी पासून सुरू झालेली आहे. त्याकरीता उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठल्याही एका विषयात उत्तीर्ण असावा, अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जमाती किंवा माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण व उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतीम मुदत ३ फेब्रुवारी असून अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी उरल्याने विद्यार्थ्यांची सध्या आॅनलाइन संकेतस्थळावर गर्दी होत आहे.

राज्यात उपलब्ध जागा

राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदाच्या जागा आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग २२, सोलापूर दोन, ठाणे १९५, यवतमाळ ६२, पालघर २९, पभरणी तीन, पुणे ३२, रत्नागिरी दोन, सांगली दोन, सांतारा १३, कोल्हापूर ७२, नागपूर २६८, नांदेड ३७, नंदुरबार ७०, नाशिक ५८, उस्मानाबाद १०, चंद्रपूर ८०, धुळे १४६, गडचिरोली १४१, गोंदिया ६८, हिंगोली दोन, जळगाव ३२, अहमदनगर ३०, अमरावती ८०, औरंगाबाद ९५, बीड तीन, भंडारा १९ जागा आहेत.

सर्कल निहाय ह्या जागा आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील एकूण रिक्त पदे विचारात घेऊन ही भरती होत असून यात नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अकोला, बुलडाणा, वाशिम कुठेही बदली होऊ शकते.

- संजय माळी, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग