शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पैनगंगेवर बंधारे उभारणार; तांत्रिक बाबी तपासण्याचे जलसंपदा विभागाला निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:16 IST

बुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्‍या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देनदीवर आठ ‘मायनर टँक’भूसंपादनाची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्‍या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे बुलडाणा जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. येत्या २३ डिसेंबरला किसान दिन देशात साजरा केला जातो. त्यानुषंगाने शेतकर्‍यांना सिंचन सुविधांसह पीक पाण्यात काय बदल झाला, यासंदर्भाने आढावा घेण्याचा  प्रयत्न केला असता, ही माहिती समोर आली नाही.पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यात विशेषत: बुलडाणा विधानसभा मतदार संघात २0 बंधारे उभारण्याबाबतचा प्रस्ताव होता. त्यानुषंगाने मध्यंतरी चाचपणीही झाली होती. हा मुद्दा आता आणखी पुढे सरकला असून, त्यासंदर्भात तांत्रिक बाबी तपासण्याच्या या सूचना दिल्या गेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवर्षण प्रवण भागात यातील काही भाग येत असल्याने हे बंधारे प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यास या भागातील शेतकर्‍यांना शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न फारसा उद्भवणार नाही. आता जलसंपदा विभागाच्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

नदीवर आठ ‘मायनर टँक’साधारणत: ३५0 ते ४५0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले असते. जवळपास आठ मायनर टँक (छोटे तलाव) पैनगंगा नदीवर यापूर्वी उभारण्यात आलेले आहेत. त्यातून लगतच्या शेतीला वर्षभर नाही तरी किमान आठ महिने सिंचनाचा लाभ होतो. त्याची व्याप्ती वाढवून मोठय़ा स्तरावर हे बंधारे उभारल्या गेल्यास परिसरातील शेतीला सिंचनाच्या पाण्याचा लाभ होऊ शकतो. त्याबाबतची ही शक्यता तपासण्यात येणार आहे.

भूसंपादनाची गरज नाही४हे बंधारे उभारताना त्यासाठी शेतकर्‍याची जमीन संपादित करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. नदीपात्रातच  हे पाणी बंधार्‍याद्वारे साठवता येणे शक्य आहे. नदी पात्रालगतची एखाद दोन फूट जमीन एखाद वेळेस यामुळे प्रभावित होईल; मात्र मोठय़ा प्रमाणावर भूसंपादन करण्याची यात गरज नसल्याचेही संकेत मिळाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाriverनदी