शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावती, करडी धरणाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:23 IST

बुलडाणा : जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने धरण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यात पद्मावती व करडी धरणाला गळती लागल्याने ...

बुलडाणा: जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने धरण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यात पद्मावती व करडी धरणाला गळती लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालव्याच्या भिंतीला तडे गेल्याने पाण्याची गळती होत असून पाटबंधारे विभागाकडून उपाययोजनांच्या हालचाली सुरू आहे.धाड : संततधार पावसाने मागील चार ते पाच वर्षाचा दुष्काळ धुवून काढला असून या भागातील प्रकल्पांना बऱ्यापैकी जलसाठा आल्याने समाधान व्यक्त होत आहे. परंतू या पावसाने येथील करडी धरणाला लागलेली पाण्याची गळती सध्या धोकादायक ठरत आहे.धाड नजीक करडी धरण असून या धरणावर आधारीत परिसरातील किमान ५०० हेक्टरवर शेतजमीन ओलीताखाली येते. तर धाडसह किमान आणखी दहा गावांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून आहे. १९९६-९७ मध्ये या धरणात प्रथम जलसाठा झाला. यानंतर या धरणाकडे पाटबंधारे विभागाने वळून बघितले नाही. आज या धरणावर अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या एकाच वर्षात उद्भवलेल्या नाहीत. धरणाच्या भिंतीवर अनेक मोठ-मोठी झाडे वाढली आहेत. झुडपांची दाट वस्ती निर्माण झाल्याने या भिंतीस तडा जाण्याची शक्यता वाढली आहे. या धरणाचे सांडव्यावर ३५ स्वयंचलित दरवाजे असून, धरणाचे सांडव्यालगतच्या संरक्षक भिंतीतून पाण्याची मोठी गळती होत आहे. हा प्रकार मागील आठ-नऊ वर्षापासून सुरू आहे. याबाबत नागरिकांनी पाटबंधारे विभागास वारंवार सुचित करुनही अद्यापपावेतो संबंधित विभागाने काहीच कार्यवाही केली नाही. याच धरणाचे भिंतीवर वॉटर लेव्हल ‘वेल’ तयार करण्यात आली. ती भिंतीत लीकेज झाल्याने मागील काही वर्षापुर्वी मातीचा भराव टाकून बंद करण्यात आली. सध्या धरणात साधारण: ६० टक्के जलसाठा झाला आहे. अजून पावसाळा राहिला असून आताच या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा वाहून जात आहे. तर पाण्याची होणारी गळती ही धोकादायक असल्याने धरणाचे खालच्या बाजूस असणाºया साधारण ८-१० गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. मागील दहा वर्षात या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर पाटबंधारे विभागाने काहीच उपाययोजना केलेली नाही.

धामणगाव धाड: विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरणाच्या कालव्याच्या भिंतीला तडे गेल्याने धरणाला गळती लागली आहे. ही पाणी गळती परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. वालसांवगीसह अन्य गावाला पाणीपुरवठा करणाºया पद्मावती धरणातील जलसाठ्यात वाढ होत असली तरी पाणी सोडण्याच्या कालव्याच्या भिंतीतूनच पाण्याची गळती होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण ढाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने येथील पद्मावती धरणातील जलसाठा ८० टक्क्यावर पोहचला आहे. संततधार पाऊस सुरू असल्याचे धरणातील जलपातळी वाढतच आहे. परंतू अशातच धरणांतील पाटाच्या कालव्याच्या भिंतीतून पाणी गळती होत आहे. धरणाच्या पायथ्याशी धामणगाव, पारध, सातगाव म्हसला यासह अन्य गावे येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. धरणाची पाणी साठवण क्षमता आठ दशलक्ष घनमीटर आहे. शिवाय या भिंतीला तडे देखील गेले आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरल्यास जास्तीची पाणी गळती होऊ शकते. शिवाय भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. अगोदरच महाराष्ट्रात तिवरे धरण फुटल्याने अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले होते, त्यातच धामना धरणाच्या भिंतीतुन होत असलेली पाणी गळती आणि त्यापाठोपाठ आता पद्मावती धरणाच्या कालव्याच्या भिंतीतून होणारी गळती धोक्याची घंटा आहे. पाणी गळतीमुळे अनेक नागरिकांनी धरणावर जाऊन पाहणी केली. भविष्यातील उपाययोजना लक्षात घेता धरणाची व पणीगळती थांबविण्यासाठी तातडीने हालचाली करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी दिला आहे.

करडी धरणाला ज्या ठिकाणी गळती आहे, त्याची पाहणी केली. तसा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यात आला आहे. लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. पद्मावती धरणातील पाणी जेथून कॅनॉलामध्ये सोडल्या जाते, त्याठिकाणी बाहेरील बाजुने अल्पप्रमाणात गळती होत आहे. यासंदर्भात धरण सुरक्षितता संघटनेचे अधिक्षक अभियंता यांना कल्पना दिली असून, ते येऊन पाहणी करणार आहेत.- ए. एन. कन्ना,कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे मंडळ, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण